‘शासन आपल्या दारी’ उपक्रम मिशन म्हणून राबवा : जिल्हाधिकारी

‘शासन आपल्या दारी’ उपक्रम मिशन म्हणून राबवा : जिल्हाधिकारी

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या जीवनात दर्जात्मक व गुणात्मक सुधारणा घडविण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम महत्त्वाचा आहे. जिल्ह्यात हा उपक्रम मिशन म्हणून राबविण्यासाठी प्रत्येक प्रशासकीय यंत्रणांनी दोन पावले पुढे येण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले. येत्या आठ दिवसांत जिल्ह्यातील योजनांच्या लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या पूर्व तयारीची बैठक जिल्हाधिकारी शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांचा राज्य शासनातील विविध विभागांशी दैनंदिन संबंध येत असतो. शासनाच्या योजनांचा, उपक्रमांचा लाभ सर्वसामान्यांना त्वरित मिळावा, तसेच प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, कार्यक्षम आणि गतिमान होण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली. ठाणे जिल्ह्यातही या उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोचवून त्यांना लाभ देण्यात येणार आहे. यासंदर्भात नुकतीच पूर्वतयारी बैठक पार पडली. प्रत्येक विभागाने त्यांच्याकडील योजनांच्या लाभार्थींची यादी तयार करून त्यांच्याकडून अर्ज भरून घेणे, त्यांची पात्रता तपासणे व त्यांना लाभ देण्यासंदर्भातील इतर कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) गोपीनाथ ठोंबरे, उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे, अभिजित भांडेपाटील, अमित सानप, जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालक छायादेवी सिसोदे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com