यंदा पर्यटकांचा महाबळेश्वरकडे सर्वाधिक कल

यंदा पर्यटकांचा महाबळेश्वरकडे सर्वाधिक कल

डोंबिवली, ता. २७ (बातमीदार) : यंदाच्या वर्षी उकाडा मोठ्या प्रमाणात वाढल्याने सर्वसामन्यांनी पर्यटनासाठी महाबळेश्वरला अधिक पसंती देत आहेत. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण असल्याने येथे उन्हाळ्या मोठ्याप्रमाणात पर्यटक गर्दी करतात.
मुंबईपासून २८५ किमी अंतरावर महाबळेश्वर आहे. स्ट्रॉबेरीची भूमी म्हणूनही ओळखले जाणारे महाबळेश्वर हे त्याच्या निसर्गरम्य सौंदर्यासाठीदेखील प्रसिद्ध आहे. महाबळेश्वर हे हिंदूंचे तीर्थक्षेत्रही मानले जाते, कारण येथूनच कृष्णा नदीचा उगम होतो. या ठिकाणी प्राचीन महाबळेश्वर (शिव) मंदिरदेखील आहे. महाबळेश्वर मंदिर, मॅप्रो गार्डन, कॅनॉट पीक, राजपुरी लेणी, वेण्णा तलाव, तापोळा, प्रतापगड किल्ला अशी अनेक प्रेक्षणीय ठिकाणे येथे आहेत. महाबळेश्वरमध्ये दोन दिवसांत भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. त्यामुळे कमी दिवसांत पर्यटन आणि थंड वातावरणात राहता यावे म्हणून महाबळेश्वरला लोक सर्वाधिक पसंती देत आहेत.
बसच्या भाड्यामध्ये वाढ झाली असून उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना थंड हवेच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी आम्ही महाबळेश्वरला पसंती दिली आहे, असे सदानंद चौधरी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com