भिवंडीत निरुपयोगी वस्तू संकलन केंद्र सुरू

भिवंडीत निरुपयोगी वस्तू संकलन केंद्र सुरू

भिवंडी, ता. २४ (बातमीदार) : केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालय यांच्यामार्फत दिलेल्या निदेशानुसार भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात ‘माझे जीवन माझे स्वच्छ शहर’ हे अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत नागरिकांकडून उपयोगी व निरुपयोगी वस्तू कचऱ्यात टाकण्याऐवजी त्या वस्तू जमा करण्यासाठी संकलन केंद्र पालिकेने सुरू केले आहे. उपायुक्त (आरोग्य) दीपक झिंजाड यांच्या मार्गदर्शनाखाली धोबी तलाव मैदान या ठिकाणी आरआरआर (रिड्यूस, रीयुज आणि रिसायकल) केंद्राचे उद्‌घाटन आरोग्य अधिकारी जे. एम. सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रभाग समिती ४ चे मुख्य आरोग्य निरीक्षक मधुकर विशे, स्वच्छ भारत अभियानाचे शहर समन्वयक नितीन क्षीरसागर, आरोग्य निरीक्षक सिद्धार्थ सोनवणे, प्रल्हाद मानकर, मुकादम व नागरिक उपस्थित होते.
या केंद्र स्थापनेचा उद्देश नागरिकांनी वापरलेल्या व निरुपयोगी वस्तूंचे संकलन करून त्याचा पुनर्वापर, नूतनीकरण किंवा नवीन उत्पादने तयार करण्यासाठी होणार आहे. हे केंद्र ५ मेपर्यंत खुले ठेवण्यात येणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी, महिला बचत गटांनी व स्वयंसेवी संस्थांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com