महिलांनी आपल्या समस्या मांडायच्या कशा?

महिलांनी आपल्या समस्या मांडायच्या कशा?

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : राज्यात ३५ टक्के महिला या विविध आस्थापनांमध्ये कार्यरत आहेत. या महिलांना मासिक पाळीच्या वेळी होणारा त्रास यामुळे त्यांना सुट्टी देण्यात यावी की नाही. याबाबत अनेक निवेदने प्राप्त झाली आहेत. यासंदर्भात आयोजित केलेल्या चर्चा सत्रात महिला व बाल विकास मंत्री यांना बोलविण्यात आले होते. मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या त्रासाबाबत एक महिलाच चांगल सांगू शकली असती. मात्र, त्या ठिकाणी पुरुष देण्यात आल्यामुळे हा प्रश्न विचारायचा कसा हा देखील प्रश्नच असल्याचे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केले.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवन येथे मंगळवारी ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या उपक्रमांतर्गत नियोजन भवन महिलांच्या तक्रारींची जनसुनावणी घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी विभाग, पोलिस आयुक्तालय, पोलिस अधीक्षक विभाग, शिक्षण, परिवहन, आरोग्य विभाग या सर्वच आढावा घेण्यात आला. त्यानंतर रूपाली चाकणकर बोलत होत्या. महिलांच्या समस्या मांडण्यासाठी मंत्री मंडळात महिला लोकप्रतिनिधी हवी होती. पण दुर्दैवाने तसे झाले नाही. त्यामुळे सरकारला माझी विनंती आहे की, त्या ठिकाणी महिला प्रतिनिधी महिला व बालविकास मंत्री म्हणून असायला हवी.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आढाव्यात मिशन वात्सलच्या केसेस मध्ये पीएम केअरच्या माध्यामतून ४८ बालकांना निधी देण्यात आला. बाल संगोपन योजनेचा लाभ २ हजार ४३ बालकांना देण्यात आला. कोविड आणि नॉन कोविड बालकांना १४१६ आणि ६२६ बालकांना त्याचा लाभ देण्यात आला.
..............................
ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक १७४ तक्रारी
राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून राज्यभरात दौरा करण्यात येत आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील दौरा हा २४ वा आहे. यामध्ये आयोजित जनसुनावणीत आतापर्यंत सर्वाधिक १७४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये कौटुंबिक समस्या तक्रारी ११६ असून सामाजिक समस्या १८, मालमत्ता समस्या ९, कामच्या ठिकाणी त्रास ५, इतर २६ अशा एकूण १७४ तक्रारी दाखल झाल्याची माहिती रूपाली चाकणकर यांनी दिली.
.......................................
समितीवर व्यक्त केली नाराजी
ठाणे जिल्ह्यात शासकीय व खासगी आस्थापनांची संख्या अधिक आहे. असे असताना, देखील अंतर्गत महिला विषयक तक्रार निवारण समिती कुठेही अस्तित्वात दिसत नाही. त्यामुळे कामगार आयुक्तांना सूचना देत, शासकीय व खासगी आस्थापनांना पत्रव्यवहार करून समिती स्थापन करण्याचे निर्देश द्यावेत. तसेच ही समिती केवळ कागदार नसून प्रत्यक्षात असावी. त्यातच अंतर्गत महिला तक्रार निवारण समितीने दिलेल्या आकडेवारी बाबत देखील साशंकता देखील व्यक्त करण्यात आली. तसेच त्यांच्या कामकाजात असलेल्या तफावत यांमुळे या समितीवर चाकणकर यांनी नाराजी व्यक्त केली.
....
एसी लोकलसाठी महिलांना हवी ५० टक्के सवलत
ठाणे, ता. २४ (बातमीदार) : महिलांना आरामदायी, सुखकर आणि स्वस्तात प्रवास करता यावा यासाठी राज्य सरकारने एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत दिली आहे. परंतु, नोकरीनिमित्त दररोज प्रवास करणाऱ्या महिलांना आता एसी लोकलच्या तिकीट दरामध्ये ५० टक्के सवलत हवी आहे. यासंदर्भाचे निवेदन कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने राज्य महिला आयोगाला दिले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या ठाणे जिल्हा दौऱ्यावर होत्या. यावेळी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या सदस्यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महिला प्रवाश्यांना भेडसावणाऱ्या समस्या तसेच विविध मागण्यांचा पाढा रुपाली चाकणकर यांच्या समोर वाचला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com