वित्तपुरवठा ही भविष्याची गुंतवणूक

वित्तपुरवठा ही भविष्याची गुंतवणूक

मुंबई, ता. २४ ः आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी वित्तपुरवठा करणे म्हणजे भविष्यासाठी गुंतवणूक करण्यासारखे आहे. त्यामुळे सरकार, आंतरराष्ट्रीय संघटना आणि खासगी क्षेत्राने एकत्र येऊन निधी पुरवठ्याला चालना देणारे नवे मार्ग शोधण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी येथे व्यक्त केले. जी-२० गटाच्या आपत्ती जोखीम घटवण्यासंदर्भातल्या कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीत त्या आज बोलत होत्या.

एकत्रितरित्या काम करून आपत्तीला सामोरे जाण्यासाठी सज्ज असे जग निर्माण करण्यात नेतृत्व करण्याची संधी ‘जी २०’ गटाला असल्याचेही पवार म्हणाल्या. कोविड साथीनंतर विविध विकास आणि वित्त धोरणांच्या केंद्रस्थानी आपत्कालीन सज्जता असायला हवे, हा महत्त्वाचा धडा आपल्याला मिळाल्याचेही त्या म्हणाल्या.
शाश्वत विकासासाठी २०३० च्या उद्दिष्ट पत्रिकेत निर्धारित आपत्ती जोखीम कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जग मागे पडले आहे, असे यावेळी पवार यांनी सांगितले. गेल्या दोन-तीन दशकांमध्ये जगात विकास झाला, पण आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी वित्तपुरवठा अपुरा आहे, असे त्या म्हणाल्या.

आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी गुंतवणूक करणे ही नैतिक जबाबदारी आणि आर्थिक गरजही आहे. संकटात टिकून राहतील अशा पायाभूत सुविधांची आणि आरोग्य सुविधांची तातडीने निर्मिती जरुरी आहे. आपत्तीचा आगाऊ इशारा देणारी यंत्रणा, सज्जतेचे उपाय, प्रतिरोधक पायाभूत सुविधा आणि आपत्तीनंतर परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी संसाधने यात गुंतवणूक झाली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
--
‘सचेत’ आगाऊ इशारा प्रणाली
आपत्तींचे व्यवस्थापन करण्यासाठी अत्याधुनिक अंदाज प्रणाली, रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान आहे; तर अलीकडेच सुरू केलेली ‘सचेत’ ही आगाऊ इशारा प्रणाली देशभरात आपत्तींचा इशारा देत असल्याचे डॉ. भारती पवार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com