अंबरनाथमध्ये आजपासून ई वाहनांचे प्रदर्शन

अंबरनाथमध्ये आजपासून ई वाहनांचे प्रदर्शन

अंबरनाथ, ता. २५ (बातमीदार) : अंबरनाथमध्ये हवेचे प्रदूषण कमी करून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शुद्ध हवा कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आला आहे, त्या अनुषंगाने ई वाहनाचा वापर वाढावा, यासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत (एनसीएपी) वृक्षारोपण, समशानभूमी विकसित करणे, चार्जिंग स्टेशनची उभारणी, वाहतूक नियंत्रण करणाऱ्या सिग्नलची उभारणी आदी कामांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच हवा शुद्ध राहण्यासाठी नागरिकांनी ई वाहनांचा जास्तीत जास्त प्रमाणात उपयोग करण्याचे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. त्यानुसार आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हस्ते शुक्रवार २६ मे रोजी ई वाहन प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन रविवार २८ मेपर्यंत सुरू राहणार आहे. नगरपरिषद कार्यालयासमोरील महात्मा गांधी शाळेच्या पटांगणात होणाऱ्या या प्रदर्शनात विविध १२ कंपन्यांचे विक्रेते सहभागी होणार असल्याची माहिती नगरपालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com