जलकलश पूजनासाठी शिवप्रेमींची गर्दी

जलकलश पूजनासाठी शिवप्रेमींची गर्दी

वाशी, ता. २७ (बातमीदार)ः मराठी तिथीप्रमाणे २ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगड येथे साजरा होणार आहे. यानिमित्त गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी अशा देशातील प्रमुख नद्यांच्या पवित्र जलाने शिवराज्याभिषेक करण्यात येणार असून मुंबई ते रायगड येथे सहस्त्र जलकलश घेऊन जाणाऱ्या रथाचे नवी मुंबईत जल्लोषात स्वागत करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पवित्र नद्यांच्या जल कलशाची रथयात्रा काढण्यात आली आहे. राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी या रथयात्रेचा राज भवन येथे शुभारंभ केला. ही रथयात्रा शनिवारी (ता.२७) दुपारी वाशी येथे पोहोचली. यावेळी आमदार गणेश नाईक यांनी या रथयात्रेचे स्वागत केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला आमदार नाईक यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी ढोल- ताशांच्या गजरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करण्यात आला. यावेळी रणरणत्या उन्हामध्ये शेकडो शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com