अपत्य होत नसल्याने पत्निचा खून

अपत्य होत नसल्याने पत्निचा खून

अंबरनाथ, ता. २९ (बातमीदार) : लग्नाला १२ वर्षे होऊनही मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात नवऱ्याने त्याच्या पत्नीच्या डोक्यात मारहाण करून खून केल्याची खळबळजनक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथमधील ऑर्डनन्स इस्टेटमध्ये घडलेल्या या घटनेने खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला.
नीतू कुमारी मंडल असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे; तर रोनीतराज मंडल असे आरोपी पतीचे नाव आहे. अंबरनाथच्या ऑर्डनन्स इस्टेटमधील एमपीएफ मैदानासमोर रोनीतराज मंडल हा पत्नी नीतू कुमारीसह राहत होता. मूळचे बिहारमधील असलेल्या दोघांचे २०११ मध्ये लग्न झाले होते. त्यांच्या लग्नाला १२ वर्षे झाली तरी त्यांना मूलबाळ होत नसल्याने नीतू कुमारीवर वैद्यकीय उपचार सुरू होते. याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार भांडणे होत असत. अखेर रविवारी (ता. २९) दुपारी रोनीतराजचा पत्नीशी पुन्हा वाद झाला. वादातून त्याने पत्नीच्या डोक्यात अवजड वस्तू मारून तिचा खून केला. अंबरनाथ पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला. रोनीतराज याला न्यायालयात हजर केले असता २ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याचे अंबरनाथ पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com