लेटलतिफांमुळे नागरिकांमध्ये संताप

लेटलतिफांमुळे नागरिकांमध्ये संताप

बदलापूर, ता. ३१ (बातमीदार) : प्रशासकीय कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळेवर हजर राहणे बंधनकारक असते. मात्र, कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे कर्मचारी या नियमाला फाटे देत ११ वाजल्यानंतर कार्यालयात कामकाजासाठी हजर राहत आहेत. त्यामुळे नागरिकांना ताटकळत राहावे लागते. या लेटलतिफांवर प्रशासन कारवाई करणार की नाही, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या कात्रप येथील नगररचना विभागात एकूण अधिकारी वर्ग धरून १० ते १२ कर्मचारी आहेत. यात तीन शिपाई सोडले तर, लिपिक व इतर कर्मचारी कामकाजाची वेळ सकाळची १० वाजताची असूनही ११ वाजता हजेरी लावतात. कर्मचारी येण्यापूर्वीच कार्यालयातील सगळे दिवे, पंखे सुरू असतात. जवळपास तास-दोन तास या ठिकाणी विजेचा अपव्यय केला जातो. पाच दिवसांचा आठवडा केला असूनही कर्मचारी उशीरा येत असतात. यामुळे नागरिकांना ताटकळत राहावे. अनेकांचा वेळ वाया जात असतो. एकीकडे सर्वसामान्य नागरिक कामकाजाच्या वेळेनंतर एक मिनिट उशिरा पोहचला की, त्याला आज काम नाही होणार उद्या या, असे सांगितले जाते. मात्र, स्वतः हे कर्मचारी कामकाजाची वेळ पाळत नसल्याने त्‍यांच्यावर कारवाई कोण करणार? असा सवाल येथे कामानिमित्त येणारे नागरिक उपस्थित करत आहे. पालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी कर्मचाऱ्यांची चूक मान्य केली असून, त्यांच्यावर चपराक बसावी यासाठी स्वतः लक्ष देणार असल्याचेही सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com