शिक्षक भरतीशिवाय आंतरजिल्हा बदली नाही

शिक्षक भरतीशिवाय आंतरजिल्हा बदली नाही

पालघर, ता. ३१ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीच्या प्रश्नासंदर्भात विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. जोपर्यंत जिल्ह्यासाठी शिक्षकभरती केली जात नाही, तोपर्यंत आंतरजिल्हा बदलीने एकही शिक्षक सोडणार नाही. तसेच शिक्षकांच्या बदलीसाठी पदाधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याचे आरोप काही वृत्तवाहिन्यांनी केले असले, तरी हे आरोप बिनबुडाचे आहेत, असे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी स्पष्ट केले. काल (ता. ३०) जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या दालनात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाविषयी अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत. जिल्ह्यात शिक्षक शाळेत जात नाहीत, यासाठी भरारी पथके नेमली जातील. काही शिक्षक दांडीबहाद्दर असून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे निकम यांनी सांगितले. जलजीवन योजनेमधील जी कामे पूर्ण झालेली आहेत, त्याच कामांची बिले अदा केली आहेत. कोणत्याही कंत्राटदाराला आगाऊ रक्कम देण्यात आलेली नाही, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.

अनुकंपा भरतीप्रमाणे ग्रामपंचायतीमधील १० टक्के भरतीदेखील लवकरच करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील हातपंप कर्मचारी कायम करण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी दिली. जिल्हा परिषदेचा जास्तीत जास्त निधी खर्च करून या वर्षी जिल्हा परिषद दायित्वात राहिली नाही, असे सांगितले. या वेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज कोरे, समाज कल्याण समिती सभापती मनीषा निमकर, महिला व बालकल्याण समिती सभापती रोहिणी शेलार, बांधकाम व आरोग्य समिती सभापती संदेश ढोणे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com