मुंबईत १५ टक्के पाणी कपातीची शक्यता

मुंबईत १५ टक्के पाणी कपातीची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : मुंबईला पाणी पुरवणाऱ्या धरणांनी तळ गाठला आहे. त्यामुळे राखीव साठा वापरण्यासाठी महापालिकेने राज्य सरकारकडे परवागी मागितली आहे. सोबतच मुंबईत १५ टक्के पाणी कपात करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मुंबईला सात धरणांतून पाणीपुरवठा होतो. या धरणांत १२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. राखीव पाणीसाठा वापरण्याची परवानगी मिळवण्यासाठी जलअभियंता विभागाने राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे; मात्र अजूनही त्याला राज्य सरकारने परवागनी दिलेली नाही. त्यातच पाऊस लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे असलेला पाणीसाठी जपून वापण्यासाठी १५ टक्के पाणीकपात करण्याच्या विचारात जलअभियंता खाते आहे. पुढच्या आठवड्यात ही पाणीकपात लागू होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com