मुंबई पोलिसांवर हल्लाप्रकरणी अटक

मुंबई पोलिसांवर हल्लाप्रकरणी अटक

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : एका तपासासाठी संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात गेलेल्या मुंबई पोलिसांवर ग्रामस्थांनी हल्ला केला होता. यात दोन संशयित आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले होते. पोलिसांवर हल्ला आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. अर्जुन ब्राह्मणवत, विठ्ठल ब्राह्मणवत, पवन ब्राह्मणवत आणि प्रताप बिघोत अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या हल्ल्यामागे नेमके कोण आहे याचा शोध पोलिस घेत आहेत.

मुंबईमध्ये झालेल्या पोलिस भरती परीक्षेदरम्यान काही उमेदवारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक अधिकारी आणि चार हवालदारांचा समावेश असलेले पोलिस पथक संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात गेले होते. शुक्रवारी पहाटे २ ते ३ वाजताच्या दरम्यान दहिसर पोलिसांच्या पथकावर ३० गावकऱ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात कॉन्स्टेबल विनोद चितळकर जखमी झाले आहेत. गावकऱ्यांनी दोन्ही संशयितांची सुटका करून पळ काढला. त्यानंतर चितळकर यांना डॉक्टरांकडे नेण्यात आले आणि १० जणांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी चार जणांना अटक करण्यात आली आहे. दहिसर पोलिसांचे पथक अद्याप संभाजीनगरमध्येच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com