रेल्वे अपघाताचे राजकारण करणे टाळावे

रेल्वे अपघाताचे राजकारण करणे टाळावे

उल्हासनगर, ता. ४ (वार्ताहर) : ओडिशा रेल्वे अपघात ही देशातील मोठी दुर्दैवी घटना आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकार सर्वतोपरी मदत करत असून असंख्य सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे आहेत. अशाप्रसंगी विरोधी पक्ष अपघाताचे राजकारण करत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी उल्हासनगरात केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला केंद्रात नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या दौऱ्याचे आयोजन केले होते. अनुराग ठाकूर यांच्याबरोबर आमदार प्रसाद लाड, आमदार संजय केळकर, आमदार कुमार आयलानी, माजी आमदार नरेंद्र पवार, शशिकांत कांबळे, जमनू पुरस्वानी, राजेश वधारिया, अमित वाधवा आदी पदाधिकारी उपस्थित होते. अनुराग ठाकूर यांनी स्वामी शांती प्रकाश आश्रमाचे प्रमुख देवप्रकाश महाराज, पूज्य चालिया मंदिराचे ट्रस्टी भगवानजी, साई वसनशाह दरबाराचे साई कालिराम यांची भेट घेतली. या वेळी मोदी सरकारने हिंदू धर्म वृद्धिंगत होण्यासाठी केलेल्या कामांची माहिती ठाकूर यांनी दिली. यानंतर उल्हासनगरची सिंधी भाषेची चळवळ चालवणारी प्रमुख संस्था सिंधी यूथ सर्कल, नामांकित हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राम मुंदडा, व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष सचानंद गोपलानी, रस्ते निर्माण करणारे कंत्राटदार केशू चंदनानी यांची भेट घेत शहरातील समस्या समजून घेतल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com