भातसा धरणाच्या कालव्यातून पाणी सोडा

भातसा धरणाच्या कालव्यातून पाणी सोडा

वासिंद, ता. ८ (बातमीदार) : दहागाव-कातबाव ग्रामपंचायत हद्दीतील गाव-पाड्यात सध्या पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे भातसा धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडावे, अशी मागणी ग्रामपंचायत व स्थानिक नागरिकांनी भातसा कालवा विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या तीव्र उन्हाळा असल्याने येथील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी तसेच इतर जलस्रोत पूर्ण कोरडे पडले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत हद्दीतील गाव-पाड्यांत पाणीटंचाई सुरू झाली आहे. दरम्यान, गावालगत जाणाऱ्या भातसा उजवा कालव्यातून पाणी सोडल्यास या ठिकाणी पाणीसाठा होऊन पाणीटंचाई दूर होण्यास मदत होईल. यासाठी दहागाव येथील शिवसेना उद्धव ठाकरे गट वासिंद विभागप्रमुख राजदीप जामदार, सचिव संजय जाधव, उपविभाग प्रमुख मिलिंद गायकवाड, नितीन गायकवाड, माजी उपसरपंच सुधीर देसले, ग्रामसेवक हरेश म्हस्के, सामाजिक कार्यकर्ते जगदीश देसले, पंडित मसणे, कृष्णा शेलार, भूषण कोरडे, शेखर देसले, जयराम गायकवाड आदींनी भातसा कालव्याचे उपअभियंता पी. जे. ढोकणे यांना निवेदन देऊन या कालव्याद्वारे पाणी सोडण्याची मागणी केली.

------------
वरिष्ठ स्तरावर पूर्तता करणार
ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी चर्चा केली. जिल्हाधिकारी यांनी भातसा कालवा व जलसंपदा विभाग अधिकारी यांना तात्काळ सूचना केली असल्याचे बरोरा यांनी सांगितले; तर यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर परवानगीसाठी पूर्तता करणार असल्याचे भातसा कालवा विभाग कार्यकारी अभियंता योगेश पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com