शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या!
वसई, ता. २७ (बातमीदार) : अवकाळी पावसामुळे वसई तालुक्यासह संपूर्ण पालघर जिल्ह्यात भातशेती, फळबाग, फुलबाग, तसेच भाजीपाला शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे लवकरात लवकर सरकारने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी माजी आमदार राजेश पाटील यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन केली आहे.
यावर्षी पावसाचे प्रमाण नेहमीपेक्षा अधिक असून, सततच्या पावसामुळे शेतीत पाणी साचणे, ओलावा टिकून राहणे व परतीच्या पावसामुळे काढणीस आलेली भातशेती आडवी पडून नष्ट झाली आहे. त्यामुळे मेहनत, वेळ व पैसा वाया गेला आहे. तसेच आर्थिक संकट ओढवले आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने पाऊल उचलून तातडीने मदत करावी, असे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. वसई तहसीलदारांना माजी सभापती अशोक पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रणय कासार, संचालक तथा उपसरपंच संजय घरत, माजी उपसभापती सुनील अंकारे, सरचिटणीस दिलीप गायकवाड आदी शिष्टमंडळाने निवेदन दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

