हरवलेले २३ मोबाईल नागरिकांना परत
हरवलेले २३ मोबाईल नागरिकांना परत
कोळसेवाडी पोलिसांची कामगिरी
कल्याण, ता. १ (बातमीदार): कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या दक्ष तपासामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पोलिसांनी विविध चोरी व गहाळ प्रकरणांमधून एकूण चार लाख ५४ हजार रुपये किंमतीचे तब्बल २३ मोबाईल शोधून त्यांच्या खऱ्या मालकांकडे परत केले. पोलिसांच्या या शोधकार्यामुळे नागरिकांचा कायद्यावरील विश्वास अधिक बळकट झाला आहे.
पोलिस हवालदार एन.डी. दळवी आणि त्यांच्या पथकाने मागील काही आठवड्यांपासून या मोबाईलचा शोध घेण्यासाठी सातत्याने परिश्रम घेतले. त्यांनी विविध तांत्रिक साधनांचा वापर करून व मोबाईल ट्रॅकिंग प्रणालीच्या साहाय्याने हे सर्व मोबाईल शोधून काढले. मोबाईल परत मिळाल्यावर नागरिकांनी पोलिसांचे मनापासून आभार मानले. या प्रसंगी पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि मोबाईल सुरक्षित ठेवण्याचे आवाहन केले.
मोबाईल हरवल्यास काय कराल?
मोबाईल हरविल्यानंतर रीतसर तक्रार नोंद करावी.
मोबाईलचाआयएमईआय क्रमांक नोंद करून ठेवावा.
मोबाईल लॉक आणि ट्रॅक करण्यासाठी सेवा पुरवठादाराशी संपर्क साधावा.
समाज माध्यमे अथवा इतरत्र वैयक्तिक माहिती न देता पोलिसांच्या मदतीची प्रतीक्षा करावी.
चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नेहमी जागरूक रहावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

