अडीच हजार शेतकरी अनुदानापासून वंचित

अडीच हजार शेतकरी अनुदानापासून वंचित

Published on

विक्रमगड, ता. १ (बातमीदार) : विक्रमगड, वाडा तालुक्यात अवकाळीने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढावले आहे. आधीच भातशेतीचे मोठे नुकसान झाले असतानाच तालुक्यांतील अडीच हजारांहून अधिक शेतकऱ्यांना मागील आर्थिक वर्षाचा आदिवासी विकास महामंडळाकडून भातखरेदी अनुदानाचा अद्यापही लाभ मिळाला नसल्याने ते वंचितच राहिले आहे. यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत.

विक्रमगड आणि वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून भात जव्हार आदिवासी महामंडळाच्या माध्यमातून २०२४-२५ या आर्थिक वर्षी भात संकलन केंद्रांवर खरेदी करण्यात आला होता. तालुक्यातील एकूण ११ हजार शेतकऱ्यांनी आदिवासी विकास महामंडळाकडे भात विक्रीकरिता नोंदणी केली होती. त्यांना भाताची आधारभूत किंमत तर मिळाली, परंतु भातावर सरकारकडून देण्यात येणारे अनुदानही मिळाले नाही.

विक्रमगड, वाडा तालुक्यांतील आठ हजार ४०० शेतकऱ्यांना लाभ मिळाला असला तरीही अडीच हजारांहून अधिक शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर अनुदान आजतागायत जमा झालेले नसल्याने ते वंचितच राहिले आहेत. अवकाळीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या भाताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मागील वर्षीच्या थकलेल्या भाताच्या अनुदानाची रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती आणखी बिकट झाली आहे.

लवकरच प्रक्रिया
विक्रमगड आणि वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदान (बोनस) अदा करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे, असे जव्हार प्रादेशिक आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी योगेश पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com