फळांचा हंगाम लांबणीवर

फळांचा हंगाम लांबणीवर

Published on

फळांचा हंगाम लांबणीवर
अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका
तुर्भे, ता. २ (बातमीदार) : अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेतमालाला बसला आहे. अनेक ठिकाणी भाज्यांचे मळे, फळबागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या भाजीपाल्याबरोबर फळांची आवक घटल्याने फळांचा हंगाम लांबणीवर पडला आहे.
ऑक्टोबर संपून नोव्हेंबर सुरू झाला आहे. तरीदेखील पावसाती स्थिती जैसे थे आहे. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भाजीपाल्याला फटका बसत आहे. जास्त पाणी लागल्याने भाज्या खराब होत आहेत. परिणामी, नवी मुंबईच्या घाऊक बाजारात बाजारात भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे उपनगरांमध्ये किरकोळ बाजारात भाजीपाल्याची कमतरता जाणवू लागली आहे. असाच पाऊस पडत राहिला, तर पुढच्या दोन महिने भाजीपाल्याची तीव्र टंचाई जाणवण्याची भीती व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. अशीच परिस्थिती फळांच्या बाबतीत झाली आहे. अनेक ठिकाणी पावसाने फळबागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जमिनीवर वेलवर्गीय फळांपैकी कलिंगड, टरबूजचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाची संततधार सुरू असल्याने अतिरिक्त पाण्यामुळे फळांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, फळांची आवक ठप्पच झाली आहे.
----------------------------------
सीताफळ, द्राक्षाला फटका
सीताफळाच्या बागांवर पाणी पडल्याने त्यावर कीड धरू लागली आहे. त्यामुळे बाजारात कीड पडलेली सीताफळे येत आहेत. नोव्हेंबर सुरू झाला की बाजारात द्राक्षे यायला सुरुवात होते, मात्र लांबलेल्या पावसामुळे द्राक्ष बागा संकटात आल्या आहेत. त्यामुळे द्राक्षांचा हंगाम लांबणीवर गेला आहे. त्यामुळे जानेवारीशिवाय द्राक्षे बाजारात येऊ शकणार नाहीत, असा अंदाज व्यापाऱ्यांकडून वर्तवला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com