पावसाने शेतात चिखलाचे राज्य
पावसाने शेतात चिखलाचे राज्य
चोळे-शिहू भागात भातपिकाचे नुकसान
पोयनाड, ता. २ (बातमीदार) : पेझारी-नागोठणे रस्त्यावरील चोळे-शिहू भागात शेतांमध्ये पाणी साचल्याने भातपिकाची मोठी हानी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, नुकसानभरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
काही दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे चोळे, शिहू, गांधे, आंबेराई भागातील भातशेतीचे नुकसान झाले आहे. या परिसरातील भातशेती रस्त्यालगत असल्याने कापणी झाल्यानंतर रस्त्याच्या एका बाजूला त्याची झोडपणी, मळणी केली जाते, पण पाऊस सातत्याने पडत असून, रस्त्याच्या कडेला कापणी केलेल्या भाताचे ढीग एकत्र करून ठेवले आहेत. त्यातून किती भात निघणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. अवकाळी पावसाने भाताच्या पिकाचा बहर घालवला आहे. या परिसरात कापणी केलेला भात पूर्ण भिजला असल्याने पीक मातीमोल झाले आहे.
------------------------
मळणीसाठी ताडपत्रीचा आधार
चोळे शिहू भागात अवकाळी पावसाने भातपिकाचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे भिजलेल्या भातपिकाची ताडपत्रीचा आधार घेत मळणी झोडण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

