श्रमदानातून उभे राहतात वनराई बंधारे

श्रमदानातून उभे राहतात वनराई बंधारे

Published on

श्रमदानातून उभे राहतात वनराई बंधारे
तळा, ता. ७ (बातमीदार) ः रायगड जिल्ह्यात भातकापणीचा हंगाम संपताच ग्रामीण भागात समुदाय सहभागातून सुरू होणाऱ्या कामांमध्ये वनराई बंधाऱ्यांचे बांधकाम हा एक महत्त्वाचा उपक्रम मानला जातो. ग्रामपंचायत हद्दीतील लहान-मोठ्या नदी-नाल्यांवर नागरिक एकत्र येऊन श्रमदानाच्या माध्यमातून हे बंधारे उभे करतात. पावसाळ्यानंतर वाहून जाणारे पाणी रोखून त्याचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा, हा या उपक्रमाचा मूलभूत हेतू असून, गेली अनेक वर्षे ही ग्रामीण भागातील पाणलोट व्यवस्थापनाची एक पारंपरिक आणि परिणामकारक पद्धत ठरली आहे.
स्थानिक नागरिकांच्या सांगण्यानुसार, गावकऱ्यांनी केलेल्या श्रमदानातून उभे राहणाऱ्या या बंधाऱ्यांमुळे पाण्याचा प्रवाह थांबतो, साठा निर्माण होतो आणि उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध राहते. काही भागात या पाण्याचा वापर गुरेढोरांना पिण्यासाठी केला जातो, तर काही ओढ्यांमध्ये महिलांचे कपडे धुणे, दैनंदिन घरगुती वापर अशा गरजांसाठीही याचा मोठा उपयोग होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com