विक्रमगडमधील वखारी सुरू न झाल्याने शेतकरी चिंतेत

विक्रमगडमधील वखारी सुरू न झाल्याने शेतकरी चिंतेत

Published on

विक्रमगड, ता. ७ (बातमीदार) : तालुक्यात भातशेतीबरोबरच माळरानावर रानगवतही मोठ्या प्रमाणात उगवते. अनेक शेतकरी, शेतमजूर हे गवत व पावलीची विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. यंदा पावसाने मोठे नुकसान सहन करावे लागले. यावर्षी भात तर गेलेच, पण निदान गवत-पावली विकून भरपाई करावी, असे शेतकऱ्याची मनी आहे. काही भागात सुरू न झालेल्या वखारी सुरू करण्याची शेतकरी वर्गाची मागणी आहे.

गवत, पावलीच्या वखारी खरेदीसाठी दिवाळीपूर्वीच सुरू होतात, मात्र काही भागात यंदा वखारी सुरू होण्यास विलंब झाला आहे. ज्या भागात वखारी सुरू आहेत, त्या भागात पावली, गवत विक्री-खरेदी व्यवसाय तेजीत आहे. शेती हंगामात हा शेतकरी, मजूरवर्ग आपल्या घरी शेती करण्यासाठी कामधंदा सोडून तीन ते चार महिने घरीच असतो. त्यामुळे कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी हातामध्ये पैसा नसतो. तीन महिन्यांचा शेती हंगाम संपल्यावर लगेचच हाताला काम नसते. त्यामुळे याचा परिणाम बाजारपेठेवर होतो. हातामध्ये पैसा नसल्याने हा वर्गदेखील अडचणीत असतो. या वेळेस भातझोडणी अंतिम टप्पात आहे. त्यामुळे त्या भाताची पावली तयार होत आहे, तर माळरानात रानगवत तयार झाले आहे. ही खरेदी केंद्र व्यापारीवर्गाने सुरू केल्यास शेतकरीवर्गाच्या हातामध्ये पैसे येतो. तालुक्यातील काही भागांत गवताच्या वखारी सुरू न झाल्याने हाल होत आहेत. त्या सुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com