वाहतूक व्यवस्थापनासाठी मुंबईत अत्याधुनिक प्रणाली

Mantralaya-Mumbai
Mantralaya-Mumbai

मुंबई - मुंबई महानगरात बिकट होत जाणारा वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून, शहरातील वाहतुकीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी आधुनिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (आयटीएमएस- इंटिलिजन्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम) प्रकल्प राबविण्यासह त्यासाठी ८९१ कोटींचा खर्च करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

मुंबईची लोकसंख्या १ कोटीच्या पुढे असून, या महानगराचे क्षेत्रफळ सुमारे ४३८ चौरस किलोमीटर आहे. महानगरामध्ये सध्या सुमारे ३४ लाख वाहने असून, प्रतिहजार व्यक्तींमागे साधारणत: २६१ व्यक्तींकडे स्वत:चे वाहन आहे. 

मुंबई महानगरातील वाहनांची संख्या, वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगा यातून प्रवासासाठी लागणारा वेळ व इंधनावर होणारा खर्च, प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेतून कार्यक्षमतेवर होणारा परिणाम या सर्वांवर उपाय म्हणून अद्ययावत वाहतूक व्यवस्थापनाची गरज आहे. 

एकत्रित वाहतूक नियंत्रण आणि नियोजनासाठी इंटेलिजन्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम हा प्रकल्प राबवला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com