पालकांनो, जरा जपूनच... पुढे धोका आहे!

file photo
file photo

मुंबई : रिक्षा-टॅक्‍सीतून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक नियमबाह्य असतानाही राज्यात अद्याप अशी वाहतूक सुरूच असल्याचे पोलिस तपासणीत उघड झाले आहे. तसेच मुंबईत स्कूल बसमधूनच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे आढळले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुमारे 17,531 बसचालकांविरोधात कारवाई केली आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली आहे.
 
स्कूल बसमधून विद्यार्थ्यांची वाहतूक करताना नियमांचे पालन केले जात नाही, असे निदर्शनास आणणारी जनहित याचिका "पीटीए युनायटेड फोरम'च्या वतीने करण्यात आली आहे. न्या. सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सोमवारी (ता. 20) सुनावणी झाली. केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार स्कूल बसला जाळी बसवणे, सुरक्षा रक्षक असणे आदी नियमांची पूर्तता होणे बंधनकारक आहे.

धक्कादायक! वाचा... घरातले झोपेत असताना तो बाथरूममध्ये गेला आणि...

राज्य सरकारच्या वतीने 7 डिसेंबर ते 14 जानेवारी यादरम्यान पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम केली होती. विद्यार्थ्यांची नियमबाह्य वाहतूक करणाऱ्यांमध्ये स्कूल बस चालकांचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी अशा बसचालकांकडून 36 लाख 72 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. राज्यभरात 833 रिक्षा-टॅक्‍सींमधून विद्यार्थ्यांची वाहतूक केल्याचे आढळले. यापैकी 100 वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

हेही वाचा : सिद्धिविनायकाचा गाभारा झळाळला सोन्याच्या मुलाम्यानी..

कारवाईचा अहवाल देण्याचे निर्देश
मुंबईत 59, ठाण्यात 69; तर नागपुरात 151 वाहने दोषी आढळल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली. याबाबत पुढील कारवाईचा अहवाल दाखल करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com