शिवसेनेचे पुन्हा भाजपला चिमटे; बेरोजगारीवरून मोदी सरकारला मारले टोमणे

Uddhav-Thackeray
Uddhav-Thackeray

‘सामना’तील अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांचा सरकारला टोमणा 
मुंबई - देशातील बेरोजगारीची जबाबदारी नेहरू- गांधींवर टाकता येणार नाही, अशा शब्दांत ‘सामना’तील अग्रलेखातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला टोमणे लगावले आहेत.

‘देशात बेरोजगारीचा आगडोंब उसळला आहे. नॅशनल सॅम्पल सर्व्हेनुसार २०१७-१८ मध्ये बेरोजगारीचा दर हा ६.१ टक्के झाला. मागील ४५ वर्षांतला हा सर्वांत जास्त आकडा आहे. केंद्रीय कामगार मंत्रालयानेदेखील त्यावर आता शिक्कामोर्तब केले आहे. हे आकडे सरकारचेच आहेत, आमचे नाहीत. सरकार पक्षाचे म्हणणे असे, की बेरोजगारी वाढत आहे हे काही आमचे पाप नाही.

बेरोजगारीचा प्रश्न हा काही गेल्या पाच वर्षांत भाजपने तयार केलेला नाही, असे नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. पण दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन होते व त्या हिशेबाने मागच्या पाच वर्षांत किमान दहा कोटी रोजगारांचे लक्ष्य पार करायला हवे होते, ते झालेले दिसत नाही व त्याची जबाबदारी नेहरू- गांधींवर टाकता येणार नाही,’ असे शिवसेनेने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com