भाजीपाल्याचे दर कोसळले; पुरवठ्यात भरघोस वाढ

Vegetable-Rate
Vegetable-Rate

नवी मुंबई - गेले तीन दिवस राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतरही वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. गुजरात, इंदूर, बेळगाव, बंगळुरूसह राज्यातील काही भागातून दोन दिवसांत तब्बल १२०० गाड्यांचा माल एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाला आहे. परंतू भाजीपाल्याच्या पुरवठ्याच्या तुलनते पावसामुळे ग्राहकराजाने पाठ फिरवल्यामुळे भाजीपाल्याचे दर तब्बल २५ टक्‍क्‍यांनी कोसळले आहेत.

आठवडाभरापूर्वी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे बाजारातील भाज्या महागल्या होत्या. रोजच्या जेवणात वापरली जाणारी कोथिंबीर व मिर्ची चांगलीच वधारली होती. परंतू राज्यातील शेतमालाच्या पूरवठ्याला परराज्यातील भाजीपाल्याच्या मालाची जोड मिळाल्यामुळे समितीमधील बाजार कोसळले आहे. सध्या वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये गुजरात, इंदूर, बेळगाव, बंगळूरू येथून भाजीपाला मोठ्या प्रमाणात येऊ लागला आहे. हा माल दूरवरून येत असल्याने राज्यात पुरपरिस्थिती निर्माण होण्याआधीच हा माल वाहनांतून मुंबईजवळ पोहोचला होता. त्यामुळे हा माल सुदैवाने नैसर्गिक आपत्तीमधून बचावल्याने बाजारात दाखल झाला. नाशिक आणि पुणे येथून नियमित येणारा भाजीपाला कमी झाला आहे. परंतू सांगली येथून आवक सुरू असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

सध्या बाजारात परराज्यातून चांगला शेतमाल येण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे राज्यभरात सुरू असलेल्या पावसाचा भाजीपाल्याच्या आवकवर परिणाम झाला नाही. मात्र बाजारात ग्राहक येत नसल्यामुळे मालाला भाव मिळत नाही.
- कैलास ताजणे, व्यापारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com