विक्रमगड येथे जनजीवन पूर्वपदावर

 पालघर जिल्ह्यात महत्त्वाची समजली जाणारी पिंजाळ नदी तुडुंब भरून वाहू लागली आहे. (छायाचित्र : अमोल सांबरे)
पालघर जिल्ह्यात महत्त्वाची समजली जाणारी पिंजाळ नदी तुडुंब भरून वाहू लागली आहे. (छायाचित्र : अमोल सांबरे)

मुंबई : विक्रमगड तालुक्‍यात गेल्या पाच दिवसात धुवाधार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडल्याने नदीनाले तुडूंब भरून वाहू लागले होते. अनेक नद्या नाल्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी पूल आणि मोऱ्या पाण्याखाली गेल्या. त्यामुळे अनेक गावांचा काही काळ संपर्क तुटला होता. आज पावसाचा जोर कमी झाल्याने पूर कमी झाला आहे.

विक्रमगड-जव्हार मार्गावरील विक्रमगड आणि जव्हारची वाहतूक सुरळीत झाली आहे. तसेच विक्रमगड-डहाणू, मनोर-विक्रमगड रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली. दिवसभरात जनजीवन सुरळीत झाले आहे.

तालुक्‍यातील महत्त्वाचे समजले जाणारे खांड लघु पाटबंधारे व मुँहू खुर्द लघु पाटबंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत; तर देहर्जा, पिंजाळ नद्या दुथडी वाहू लागल्या आहेत. मात्र, पाच दिवसांपासून सततच्या पावसाने भात शेती पाण्याखाली गेल्याने पिके कुजण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com