ठाणे : गुलाब चक्रीवादळामुळे मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाची गेले दोन-तीन दिवस दमदार बॅटिंग सुरू आहे. जिल्ह्यातील भातसा, बारवी ही मोठी धरणे आधीच काठोकाठ भरली असताना, या पावसामुळे या धरणांमधील पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे. परिणामी या दोन्ही धरणांचे दरवाजे उघडून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, गुलाब चक्रीवादळामुळे मुंबई, ठाणेसह इतर शहरांची पाणीचिंताही मिटली आहे.
ठाणे जिल्ह्यात पावसाने यंदा दमदार हजेरी लावली. ठाणे-मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्वच धारणांच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन ही धरणे वाहू लागली आहेत. तुळशी, विहार, मोडकसागर ही धरणे १०० टक्के भरली आहेत. भातसा, बारवी ही धरणे ९९ टक्के भरली आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.