पाणीप्रश्‍न न सोडवल्यास महापौर बंगल्याला घेराव 

पाणीप्रश्‍न न सोडवल्यास महापौर बंगल्याला घेराव 

मुंबई : मुंबईत छुप्या पाणी कपातीचा फटका अनेक भागांना बसत आहे. पाणीटंचाईने रहिवाशी हैराण झाले आहेत. पाणीटंचाईचा भडका आज पालिकेच्या सभागृहात उडाला. पाणीटंचाईचा प्रश्‍न येत्या दोन दिवसांत सुटला नाही तर ऐन दिवाळीत महापौर बंगल्यावर आंदोलन करण्याचा इशारा विरोधी पक्षांनी दिला.

प्रशासन पाणीप्रश्‍नावर गंभीर नसल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी सभात्याग केला. 

छुप्या पाणी कपातीने त्रस्त असलेल्या रहिवाशांचा आवाज आज पालिका सभागृहात उमटला. राष्ट्रवादीच्या नगरसेविका सईदा खान यांनी पाणीप्रश्‍नावर 66 ब अन्वये यावर चर्चा घडवून आणली. पाणीप्रश्‍नावर चर्चा सुरू असताना जल विभागाचे अभियंता सभागृहात गैरहजर असल्याने विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी नाराजी व्यक्त केली. महापौरांनी बोलावूनही जल अभियंता सभागृहात येत नसेल तर कशा प्रकारचा कारभार सुरू आहे?, दिवाळीसारखा सण तोंडावर आला असताना सत्तेत बसलेली शिवसेना आणि स्वतःला पहारेकरी समजणारे सभागृहात काहीच का बोलत नाहीत, पाण्याअभावी जीटी रुग्णालयातील शस्त्रक्रिया थांबवण्यात आल्या. जेजे रुग्णालयातही पाण्याची समस्या भेडसावत आहे, ही बाब गंभीर असल्याचे ते म्हणाले. 

उपाययोजना करण्याची मागणी 
मुंबईतील अनेक भागांत सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला असून, पालिकेने छुपी पाणी कपात केली आहे. अपुऱ्या पावसाअभावी भविष्यात आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवल्यास पालिकेकडे अन्य पर्यायी व्यवस्था उपलब्ध नाही. सिमेंट कॉंक्रीटीकरणामुळे पाणी जिरण्याचे प्रमाण कमी होऊन भूजल पातळी खालावली आहे. त्यामुळे पाण्याची समस्या अधिकच जटिल होत चालली आहे. पालिकेने पाण्याचे योग्य नियोजन करावे. विहिरी, झरे पुनरुज्जीवित करावे, पावसाचे पाणी साठवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सईदा खान त्यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com