अडीच महिने अगोदरच पाणी टंचाई

water-crises.jpg
water-crises.jpg

मोखाडा : पावसाने दडी मारल्याने यंदाचा खरीप हंगाम वाया गेला आहे. पोट भरेल एव्हढे धान्य ही आदिवासी शेतकऱ्यांच्या हाती लागलेले नाही. दुष्काळाच्या सावटाखाली असलेला मोखाडा, 50 टक्के पेक्षा कमी आणेवारी असताना अजून ही दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेला नाही. पोट भरण्याच्या विवंचनेत असणार्‍या आदिवासीं समोर डिसेंबरच्या मध्यान्यं पासून, अडीच महिने अगोदरच पाणी टंचाईचे संकट उभे राहिले. विहीरीं कोरड्या पडू लागल्या आहेत. तालुक्यातील  14 गावपाड्यांमध्ये पाणी टंचाईची ठिणगी पडली असुन, महिलांची पाण्यासाठी पायपीट सुरू झाली आहे.  

दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या मोखाड्यातील आदिवासी समोर, आपल्या कुटूंबाची गुजराण कशी होईल, याची चिंता आहे. स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध नसल्याने, मजुर स्थलांतर करीत आहेत. या गर्तेत सापडलेल्या आदिवासी समोर अडीच महिने अगोदरच डिसेंबरच्या मध्यान्य पासून पाणीची ठिणगी पडली आहे. तालुक्यातील गोळीचापाडा, धामोडी, दापटी, धामणी, स्वामीनगर, कुंडाचापाडा, शास्त्रीनगर, भोवाडी, कुडवा, बिवलपाडा, आसे, वारघडपाडा, गवरचरीपाडा, आणि पेंडक्याचीवाडी या  14   गाव-पाडयांनी डिसेंबरच्या 15 तारखेपासून पाणी टंचाईचे चटके सोसणे सुरू केले आहे. या गाव पाड्यांमधील विहीरी कोरड्या पडल्या आहेत. 
         
या गाव पाड्यांनी टॅंकर द्वारे पाणी पुरवठ्याची मागणी  20  डिसेंबर पासून केली आहे. मात्र, टॅंकर द्वारे पाणी पुरवण्याची मंजुरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन देण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील आदिवासी महिलांची पाण्यासाठी पायपीट सुरू झाली आहे. दुष्काळात पाणी टंचाई चा तेरावा महिना ऊजाडला आहे.

गतसाली फेब्रुवारी च्या अखेरीस पाणी टंचाई ला सुरूवात झाली होती.  78  टंचाईग्रस्त गाव-पाडयांना   20   टॅंकर द्वारे पाणी पुरवठा करण्यात आला होता. मात्र, या वर्षी अडीच महिने अगोदर च पाणी टंचाई निर्माण झाल्याने , टंचाई ग्रस्त गाव-पाडयांची संख्या  100  री पार करणार असल्याची शक्यता पाणीपुरवठा विभागाने वर्तविली आहे. त्यासाठी किमान  25  ते  27  टॅंकर ची आवश्यकता भासणार आहे.

 ''पाणी टंचाई निर्माण झालेल्या गावपाड्यांची पाहणी, पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी आणि पाणी पुरवठा कर्मचारी यांच्या सह केली आहे. टंचाईग्रस्त गाव-पाडयांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या मंजुरीसाठी प्रस्ताव ऊपविभागीय अधिकारी यांचे कडे पाठविला आहे. तेथून ते जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविले जातील. साधारणतः आठ दिवसांत मंजुरी मिळेल.''
- बी. एम. केतकर, तहसीलदार, मोखाडा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com