पाणीपुरवठ्याची वीजबिले टंचाई निधीतून

Fund
Fund

मुंबई - राज्यातील दुष्काळी १५१ तालुके, २६८ महसूल मंडळांतील ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज बिलाच्या मुद्दल रकमेपैकी ५ टक्के रक्कम शासन भरणार असून, थकीत बिलांवरील दंड-व्याज माफ करण्यात आले आहे.

तसेच दुष्काळी तालुक्‍यांतील व महसूल मंडळांतील नोव्हेंबर २०१८ पासून जून २०१९ पर्यंतचे पाणीपुरवठा योजनांचे चालू बिल मदत व पुनवर्सन विभागाच्या टंचाई निधीतून भरण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी  भागातील पाणीपुरवठा योजनांची वीज खंडित न करण्याच्या सूचना देऊन थकीत बिलांपैकी ५ टक्के रक्कम शासन भरणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार पाणीपुरवठा देयकांच्या थकबाकीच्या मुद्दलाच्या रकमेपैकी ५ टक्के म्हणजे ३८.७८ कोटी एवढी रक्कम महसूल व वन विभागाकडून ऊर्जा विभागामार्फत महावितरणला दिली जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com