रस्त्यांची दुरावस्था! गतिरोधक,दुभाजकांवरील पांढरे पट्टे गायब

ऐन पावसाळ्यात अपघातांना आमंत्रण
रस्त्यांची दुरावस्था! गतिरोधक,दुभाजकांवरील पांढरे पट्टे गायब

मुंबई : रस्त्याने प्रवास करत असताना आपल्याला कायमच त्यावर पांढरे व पिवळ्या रंगाचे पट्टे असल्याचं दिसून येतं. रस्त्यांवरील धोके व सूचना देण्यासाठी हे पट्टे आखण्यात आले असतात. मात्र, ऐन पावसाळ्यात रस्त्यांवरील हे पट्टे पुसले गेले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात अपघात होण्याची शक्यता आहे. राज्यातील राज्य महामार्ग, राष्ट्रीय आणि महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांवरील हे पट्टे मिटले आहेत. (white-and-yellow-stripes-on-roads-disappeared)

खरंतर पावसाळा सुरु होण्यापूर्वी उन्हाळ्यामध्येच रस्त्यांशी संबंधित कामे पूर्ण करायची असतात. मात्र, त्या दिशेने कोणतंच काम झालेलं दिसत नाही. विशेष म्हणजे अलिकडेच रस्ता सुरक्षा अभियानदेखील पार पडले. परंतु,तरीदेखील रस्त्यांवरील अपघात टाळण्याच्या दृष्टीने कोणतेही काम न झाल्याचं दिसून येत आहे. म्हणूनच, राज्यभरातील रस्ता सुरक्षा अभियान अपयशी ठरल्याचं पाहायला मिळतं.

रस्त्यांची दुरावस्था! गतिरोधक,दुभाजकांवरील पांढरे पट्टे गायब
लग्नानंतर का वाढतं मुलींचं वजन?; जाणून घ्या कारण

यावर्षी हवामान खात्याने पाऊस जास्त होण्याचा अंदाज दर्शविला असून पावसात वाहन चालवणे धोक्याचे असते. अशावेळी रस्ते सुरक्षित आणि दिशादर्शक, सूचना फलक रस्त्यावर लावणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, या उन्हाळ्यात ही काम करण्यात आली नसल्याचे दिसून आलं. मुंबई उपनगरील रस्त्यांवर सुद्धा अनेक भागात गतिरोधक नसणे, नियमित रस्त्यांवर पाणी साचणे, तसंच रस्त्यांवर कोणताही सुचना फलक नसल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे रस्ता खचून जाणे किंवा नियमबाह्य गतिरोधक चालकाला दिसले नाही. तर, अपघात होण्याची शक्यता वाढत आहे.

गेल्यावर्षी सुमारे 25 हजारपेक्षा जास्त अपघात झाले असून, यामध्ये गंभीर, किरकोळ अशा सर्वप्रकारच्या अपघातांचा समावेश आहे. तरीही दरवर्षी राज्यभरात विविध कार्यक्रमाच्या माध्यमाने साजरा करण्यात येणारा रस्ता सुरक्षा अभियान प्रत्यक्षात अंमलबजावणी कधी होईल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

रस्त्यांची दुरावस्था! गतिरोधक,दुभाजकांवरील पांढरे पट्टे गायब
तुमची मुलं एकलकोंडी झालीयेत? मग वेळीच द्या लक्ष

रस्ता सुरक्षा अभियानात 'या' कामांकडे दुर्लक्ष

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत यांनी रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेची काम करायची होती. यामध्ये अपघात स्थळांची माहिती घेऊन तेथे दुरुस्ती करणे, रस्त्याचे डिझाइनमध्ये बदल करणे, रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करून घेणे, साईनबोर्ड व माहितीचे बोर्ड लावणे, दुभाजकाचे व गतिरोधकांची रंगरंगोटीचे काम करणे, नादुरूस्त सिग्नल्स, खराब झालेले बोर्ड दुरुस्ती करणे, महत्त्वाच्या जंक्शनवर पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे आखून घेणे, प्रवासी मार्गदर्शक बोर्ड लावणे, रस्ता दुरुस्तीचे ठिकाणी सावधानतेचा इशारा व उपाययोजना करण्याची आवश्यकता होती. मात्र, यातील बहुतेक काम झालेच नसल्याचे दिसून येत आहे.

"राज्यातील रस्ते ज्या ज्या विभागाच्या अंतर्गत येतात त्यांनी विविध धोके आणि सूचना दर्शवणारे पांढरे आणि पिवळे पट्टे मारायचे आहे. रस्ता सुरक्षाअंतर्गत सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी हे काम करून घ्यायचे असतात. जर हे काम झालं नसेल तर याला संबंधित विभाग जबाबदार आहे", असं राज्य परिवहन विभागाचे आयुक्त अविनाश ढाकणे म्हणाले.

संपादन : शर्वरी जोशी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com