मुंबईत पूल कोसळला; आता जबाबदारीची टोलवाटोलवी सुरू!

MUMBAI
MUMBAI

मुंबई : पूल कोसळून निरपराधांचे मृत्यू होण्याची मुंबईकरांना जणू सवयच झाली आहे.. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ असलेला पादचारी पूल कोसळून आज (गुरुवार) किमान दोघांना जीव गमवावा लागला. आता नेहमीप्रमाणे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 'आम्ही त्यांना सांगितले होते', असे सांगत आता जबाबदारी झटकण्याचा प्रकार सुरू होत आहे.

'मुंबईतील सर्व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे. पण या पुलाचे ऑडिट झाले नव्हते. यासंदर्भात काही वर्षांपूर्वीच तत्कालीन नगरसेवकांनी महापालिका आणि प्रशासनाकडे पत्र पाठवून याचे स्मरण करून दिले होते. पण त्यावर काहीही कारवाई झालेली नाही', असा आरोप स्थानिक लोकप्रतिनिधी सुजाता सानप यांनी केला.

तसेच, एमआयएमचे स्थानिक आमदार वारिस पठाण यांनीही घटनास्थळी धाव घेतली. 'इतक्या वेळा सरकारला आठवण करून देऊनही प्रशासन ढिम्मच होते. त्यांनीही यासंदर्भात काहीही कारवाई केलेली नाही. या दुर्लक्षासाठी जबाबदार असलेल्यांना तत्काळ निलंबित करावे', अशी मागणी पठाण यांनी केली.

हा पूल महापालिकेचा आहे की रेल्वे प्रशासनाचा आहे, यासंदर्भातही गोंधळाचे वातावरण होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com