कसाब म्हणाला होता मला सोडले तर...

ajmal kasab
ajmal kasab

मुंबईः मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी पकडण्यात आलेला जीवंत पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबला विचारण्यात आले होते, तुला सोडले तर काय करशील? घरी जाऊन आई-वडीलांची सेवा करेल, असे उत्तर त्याने दिले होते.

26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 166 निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. शिवाय, शेकडो नागरीक जखमी झाले होते. यामध्ये दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, मुंबई पोलिसांच्या पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे, चकमक फेम पोलिस निरीक्षक विजय साळसकर, लष्कराचे एनएसजी कमांडो मेजर संदीप उन्नीकृष्णन आणि एएसआय तुकारम ओंबळे यांना वीरमरण आले होते. दहशतवादी हल्ल्यावेळी पाकिस्तानचा दहशतवादी अजमल आमीर कसाब याला जिवंत पकडण्यात आले होते.

ब्रिगेडियर (सेवानिवृत्त) गोविंद सिंह सिसोदिया यांनी कसाबला विचारले होते की, जर तुला सोडले आणि घरी जाण्याची परवानगी दिली तर तु काय करशील? यावर त्याने घरी जाऊन आई-वडीलांची सेवा करेल, असे उत्तर दिले होते. प्रश्नाचे उत्तर देताना कसाब भाऊक झाला होता. सिसोदिया यांनी 45 मिनिटे कसाबची चौकशी केली होती. चौकशीदरम्यान दहशतवादी प्रशिक्षण कोठे घेतले? यासह विविध प्रश्नांची उत्तरे त्याने उर्दू, हिंदी व पंजाबी भाषेत दिली होती, असे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे.

पुण्याच्या येरवडा कारागृहात क्रूरकर्म कसाबला 21 नोव्हेंबर 2012 रोजी फाशी देण्यात आली. पुढे येरवडा कारागृहाच्या आवारातच कसाबचा दफनविधी करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com