विट्ठलवाडी स्थानका जवळ तरुणाचा लोकलच्या धडकेत मृत्यु

Kushant.jpg
Kushant.jpg

उल्हासनगर : उल्हासनगरातील शांतिनगर परिसरात राहणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणाचा लोकलच्या धडकेत दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना आज सकाळी विट्ठलवाड़ी रेल्वे स्थानका जवळ घडली आहे. वारंवार पाठपुरावा करून देखील रेल्वेने अर्धवट सोडलेल्या  पुलाचे काम सुरु केले नाही. रेल्वेच्या कामचुकार पणामुळे हा बळी गेला आहे.

आई वडिलांचा एकुलता एक आधार हिरावून घेतलेल्या रेल्वेने तरुणाच्या आईवडिलांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केली आहे.
 कुशांत खैरनार असे लोकलच्या धडकेत मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तो केवळ 19 वर्षाचा होता. कुशांत हा त्याचे आईवडिल आणि लहान बहिणी सोबत उल्हासनगरातील शांतिनगर मध्ये राहत होता. घरची परिस्थिती बेताची असल्याने व त्यात बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारी पार पाडण्यासाठी कुशांत हा ऐरोली मध्ये खाजगी कंपनीत कामाला जात होता. 

आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास कुशांत कामाला जात असताना अंबरनाथच्या दिशेकडे जाणाऱ्या लोकलच्या धडकेत कुशांत मृत्यूमुखी पडला. शांतिनगर, चोपडा, मिनाताई ठाकरे नगर, डॉल्फिन रोड येथील हजारो नागरिक रेल्वेने प्रवास करण्यासाठी शेवटच्या टोकाच्या दिशेने प्लेटफार्म वर रेल्वे क्रॉस करून जातात. त्यामुळे यादिशेला पुल बांधण्याची मागणी केली होती. मात्र कोळसेवाडीच्या दिशेने पुलाचे काम पूर्ण करणाऱ्या रेल्वेने शांतिनगरच्या दिशेचे काम अर्धवट सोडले.

काम पूर्णत्वास आणण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. पण त्याकडे रेल्वे दुर्लक्ष करत आहे. असा शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केला आहे. हा पुल बांधला असता तर कुशांतचा बळी गेला नसता. त्यामुळे कमावता आधार गमावलेल्या कुशांतच्या आईवडिलांना आर्थिक मदत करावी अशी मागणी असल्याचे चौधरी यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com