चेतना तरंग  : स्वत्व आणि बुद्धी

Sri-Sri-ravishankar
Sri-Sri-ravishankar

आपण स्वतः म्हणजे मन आणि शरीराचे मिश्रण नव्हे. शरीर किंवा मन या दोन्हीपैकी कोणीही आत्मा नव्हे. सर्व योगासने तुम्ही शरीरासाठी करता आणि ध्यानधारणा मनासाठी. या शरीराच्या अस्तित्वाचे प्रयोजन तुम्हाला तुम्ही किती सुंदर आहात, याची जाणीव करून देणे हे आहे आणि तुम्ही हृदयात जपलेली मूल्ये जगणे शक्य करण्यासाठी आणि तुमच्या सभोवती दैवी विश्‍व निर्माण करण्यासाठी आहेत! शांत असो वा अस्वस्थ, तुमचे मन मनच राहते. आजारी असो वा निरोगी, तुमचे शरीर हे शरीरच राहते. आत्मा मात्र सर्वव्यापी आहे. शरीराचा एखादा भाग उत्तेजित झाल्यास सुख मिळते. तुमचा आत्मा उत्तेजित होतो तेव्हा प्रेम निर्माण होते. प्रेमाला अंत नाही, पण सुखाचा अंत होतो. बहुतेक वेळा लोकांना वाटते की, सुख म्हणजे प्रेम. सुख आणि प्रेम यातील फरक समजून घेतला पाहिजे. तो भाग्यवान असेल त्यालाच समजेल. तुम्ही साखर खाऊन जिभेला उत्तेजित करता, तसेच संगीतामुळे कान उत्तेजित होतात आणि दृश्य डोळ्यांना उत्तेजित करते. आत्म्याला काय उत्तेजित करते? साधना आणि सत्संग आत्म्याला उत्तेजित करतात! या सगळ्यातून एखाद्याला काय हवे असते, तर आत्म्याचे उत्तेजन. याची अंधुकशी कल्पनाही जीवन सुरू ठेवते. बाकी सर्व उत्तेजक फक्त वरवरचे आहे. आत्म्याचा उत्तेजक शक्तिवर्धन करतो आणि शरीराचा उत्तेजक थकवा आणतो. प्रत्येक उत्तेजक तुम्हाला आत्म्याकडे नेणारा असावा. म्हणजे तुम्ही संगीत ऐकता तेव्हा संगीत उंची गाठते. तुम्ही ज्ञानाचे श्रवण करता तेव्हा ते तुम्हाला मौनाकडे नेते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सत्यम् परम धीमही 
बुद्धीच्या पलीकडे सत्य आणि दिव्यता मी माझ्या जाणिवेत धारण करतो. बुद्धी ही जगाचे विभाजन करते आणि तीच बुद्धी दिव्यत्वात विलीन होऊन जगाला एकत्र आणू शकते. बुद्धी ऐहिक गोष्टींची चर्चा करते तेव्हा ती अस्तित्वाची विभागणी करायला लागते. ती ज्ञानाची, सुज्ञपणाची आणि सत्याची चर्चा करू लागते, तेव्हा एकीकरण व्हायला सुरुवात होते. बुद्धीच्या पलीकडील गोष्टी समोर येतात. ती तिच्या खऱ्या स्वभावाचा प्रतिशोध घेते, जो अद्वैत आहे. तुम्ही तक्रार करता, कविता रचता किंवा ज्ञान सांगता, तेव्हा तुम्ही प्रवाहाचे साक्षीदार असता. समजा कुणी तक्रार करीत असेल किंवा समर्थन करत असेल तर ते फक्त उत्स्फूर्तपणे काहीतरी बोलत असतात. त्याचप्रमाणे तुम्ही आत्मज्ञान सांगता किंवा उस्फूर्तपणे कविता रचून जोरात म्हणता, तेव्हा तो बुद्धीचा प्रवाह असतो. बुद्धिमत्तेतून काहीही प्रवाहित होऊ शकते आणि तुम्ही त्या प्रवाहाचे साक्षीदार असता. तुम्ही फक्त दिव्यत्वाची प्रार्थना करू शकता, ‘सुज्ञपणा, दिव्यता आणि सत्य यांचा प्रवाह बुद्धीतून होऊ दे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com