चेतना तरंग : धर्माचे मर्म समजून घ्या...

चेतना तरंग : धर्माचे मर्म समजून घ्या...

आत्मीयतेच्या भावनेशिवाय उपासना करणे किंवा देवत्व बहाल करणे, हे नेहमी निष्फळ असते. अशी उपासना फक्त भीती आणि दुरावा याला कारणीभूत होते. काही लोक उपासनेबद्दल त्रासलेले असतात, ते इतरांना उपासना करताना पाहिल्यावरही चिडतात.

जगाच्या वेगवेगळ्या भागांत उपासनेच्या किंवा देवत्व बहाल करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. काहीजण पोपची (ख्रिश्चन धर्मगुरूंची) उपासना करतात, तर काहीजण प्रसिद्ध तारका वा गायकांची उपासना करतात. काही जणांना राजकीय व्यक्तींचे वेड असते. सगळ्या लहान मुलांकडे पाहा, भिंतीवर सगळीकडे लावलेल्या त्यांच्या नायकांच्या भित्तीचित्रांची ते उपासना करतात. फक्त एखाद्याबद्दलचा जिव्हाळा तुम्हाला त्यांचे चाहते बनवतो. आत्मीयतेची भावना आणि तुम्हाला अतिशय आदरणीय असणाऱ्या व्यक्तींमध्ये दिव्यत्व पाहण्याच्या सवयीने तुम्ही संत बनता. आत्मीयतेच्या भावनेशिवाय उपासना करतात आणि उपासनेच्या विरोधात असतात, ते एकाच नावेचे प्रवासी असतात, कारण दोघेही भयग्रस्त असतात.

बायबलप्रमाणे, ‘मी तुमचा देव आहे. माझ्याशिवाय तुमच्यासाठी दुसरा कुठलाही देव असू शकत नाहीत.’ भारतीय पौराणिक ग्रंथातही असेच उल्लेख आहेत. ‘ज्या देवाची उपासना करतो, तो देव स्वतःच्या अस्तित्वाच्या चैतन्याहून वेगळा आहे, असे ज्याला वाटते तो मतिमंद आहे.’ असे ग्रंथांत म्हटले आहे. तसेच, ‘पूजो और न देव,’ दुसऱ्या देवांची पूजा करू नका, असेही म्हटले आहे. अर्पण करणे, अर्पण केले ते आणि अर्पण करणारा हे सर्व एकच आहेत. माणसाला सदाचारी आणि प्रेमळ बनवणे हे धर्माचे काम आहे. 

राजकारण आणि धर्म
राजकारण म्हणजे लोकांची आणि त्यांच्या हिताची काळजी घेणे. धर्म आणि राजकारण यांचे एकत्र अस्तित्व असत नाही, तेव्हा भ्रष्ट राजकारणी आणि भोंदू धार्मिक नेते सत्तेवर असतात. एक सदाचारी आणि प्रेमळ धार्मिक व्यक्ती नक्कीच सगळ्या जनतेच्या हिताची नीट काळजी घेईल. म्हणूनच ती एक चांगली राजकारणी असते. खरा राजकारणी फक्त सदाचारी आणि प्रेमळच असू शकेल. तो धार्मिक असणारच. दुसरे काही असूच शकत नाही. सर्व अवतार आणि ईश्वराचे प्रेषित लोकांची काळजी करत आले आहेत. म्हणूनच ते राजकारणात होते. अशा परिमाणाची बरीच उदाहरणे दिसतील. धर्म उपासनेच्या स्वातंत्र्यावर आणि उपासनेच्या पद्धतीवर मर्यादा आणतात, तेव्हा ते एक सुसंवादी समाज निर्माण करण्यास अयोग्य ठरतात. सर्वांना सामावून घेतो, प्रार्थना आणि उपासना कोणत्याही पद्धतीने करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देतो, तोच धर्म जनतेमध्ये सदाचार आणि शांती आणतो आणि समाजासाठी सुयोग्य असतो. लोकांना वाटते, की राजकारण आणि धर्म हे वेगवेगळे ठेवायला हवेत. कारण बऱ्याच धर्मांनी उपासना करण्याचे स्वातंत्र्य दिले नाही, सर्व लोकांची सारखी काळजी घेतली नाही. इतिहासाने दाखवून दिले आहे, की धर्मामुळे संघर्ष निर्माण झाला; पण अधार्मिक समाजाने (उदा. कम्युनिझम) गोंधळ आणि भ्रष्टाचार निर्माण केला. आज धर्म आणि राजकारण दोन्हीत पुनर्बांधणीची आवश्यकता आहे. उपासनेचे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी धर्म सहिष्णू आणि जास्त आध्यात्मिक व्हायला हवा. जगातील साऱ्या चातुर्याला सामावून घेण्यासाठी धर्म सहिष्णू व्हायला हवा आणि राजकारणी जास्त सदाचारी आणि आध्यात्मिक व्हायला हवेत.

श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com