चेतना तरंग :  मी कोण आहे? 

ravishankar
ravishankar

आपण मागील लेखात स्मरणशक्तीचे महत्त्व जाणून घेतले. एकदा एक राजपुत्र आपली ओळख विसरला आणि रस्त्यावर लोकांकडे भीक मागायला लागला. काही कारणामुळे त्याची स्मृती नष्ट झाली होती. राजाच्या शिपायाने काही दिवसांनंतर त्याला रस्त्यात भीक मागताना पाहिले. त्याने राजपुत्राला सांगितले, ‘‘तू राजपुत्र आहेस, राजा तुझा सगळीकडे शोध घेत आहे.’’ 

हे ऐकल्याबरोबर राजपुत्राची स्मृती जागी झाली. त्या क्षणीच त्याच्या वागण्या बोलण्यात फरक पडला. चालण्या, बोलण्यात, वागण्यात राजपुत्राचा रुबाब आला. जो माणूस काही मिनिटांपूर्वी चहा पिण्यासाठी लोकांकडे पाच-दहा रुपयांची भीक काकुळतीला येऊन मागत होता त्याची स्मृती परत आल्यावर त्याच्यात इतके आमूलाग्र परिवर्तन झाले. इतर लोकांना हुकूम देण्याइतके शूरत्व त्याच्यात आले. याप्रमाणेच ‘‘मी कोण आहे?’’ याच्या स्मृती जागविल्यावर तुमच्यातला सगळा कोतेपणा निघून जाईल. तुमच्यात नवीन उत्साह संचारेल. ‘‘मी कोण आहे?’’ मी देवाचा पुत्र किंवा पुत्री आहे, हा विचारच तुम्हाला शक्तिशाली बनवेल. मला कशाची कमतरता आहे? सगळे जग माझ्यासाठी आहे. काळ-वेळ मला काही करू शकणार नाही, अशा प्रकारची विरता तुमच्यात संचारेल. ‘‘मी खरोखरच अमृतस्य पुत्र आहे. मला अंत नाही,’’ हा वीरश्रीयुक्त विचार तुमच्यात भिनायला हवा. 

ही वीरश्री तुमच्यात कधी संचारेल? तुम्ही गुरूच्या सान्निध्यात ज्या क्षणी जाल त्याच क्षणी तुमच्यात ती संचारली पाहिजे. गुरूचे सान्निध्य लाभलेले आहे, हा विचारच तुम्हाला शूर बनवेल. तुम्ही ईश्वराचा अनुभव घेतला नसेल, परंतु तुम्हाला कोणी आपलेसे म्हणणारा मिळाल्यावर भीती बाळगण्याचे कारण काय? राजाच तुमच्या पाठीशी उभा असताना, एखाद्या पंतप्रधानासारखे चालायला काय हरकत आहे? राजे लोकांना त्यांच्या विवंचना असतात, डोकेदुखी असते. परंतु राजाच्या जवळच्या सहायकांना, वैयक्तिक सल्लागारांना कसली डोकेदुखी आहे? असे लोक नेहमीच उत्साहात असतात. ईश्वराला काळजी करायची असेल तर करू द्या, तुम्ही कशाला काळजी करता. तुम्ही तुमचे मन शांत ठेवा. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आपण उत्साहाने आणि वीरश्रीपूर्वक चालले पाहिजे. हे कधी होणार? असे स्मृतीमुळेच घडू शकते. ईश्वर तुमचाच आहे, असे तुम्हाला वाटले पाहिजे. तुमचे देवळात जाणे वस्तुनिष्ठ आणि औपचारिक असते. देव तुमचा आहे हा भावच त्यामध्ये नसतो. ‘‘ईश्वर हा माझा आहे आणि माझ्या मनात तो वसलेला आहे,’’ हा भाव तुमच्यात निर्माण व्हायला हवा. मनात हा भाव निर्माण होईल त्या क्षणापासून तुमच्या जीवनात वीरश्री संचारेल. मनातली शंका निघून जातील. आपल्याला पाहिजे असेल, त्याप्रमाणेच सर्व गोष्टी घडायला लागतील. आपल्या दृष्टीने जे योग्य आणि चांगले असेल ते आपल्याला मिळेल. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

स्मृतीमुळे काय होते? स्मृतीमुळे आपण ज्ञानी तसेच अज्ञानीही बनू शकतो. आपल्या सत्त्वाच्या स्मृतीने आपण ज्ञानी बनतो. नको त्या गोष्टी आठवून आपण अज्ञानाच्या दरीतही पडू शकतो. ‘‘तो मला असे म्हणाला, लग्नसमारंभात माझ्याशी तो इतक्या उद्धटपणे कसा काय वागला...’’ अशा क्षुल्लक गोष्टी आठवून त्याच पुढे उगाळत बसण्यात अज्ञान असते. तुम्ही दु:खी-कष्टी का होता? तीन चार दिवसांपूर्वी मनात बाळगलेली इच्छा फलद्रूप झाली नाही म्हणून आज त्याचे दु:ख तुम्हाला होत आहे. त्या फलद्रूप न झालेल्या इच्छेच्या स्मृतीमुळे तुम्हाला दु:ख होत आहे. तुम्हाला मागचे काही आठवलेच नाही तर दु:ख होणारच नाही. तुम्हाला काही टोचले किंवा लागले तर तेवढ्यापुरते दुखेल, पण लागल्यामुळे दु:ख होणार नाही. स्मृती जागृत असतानाच मनाला दु:ख होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com