जोडणीचे काम पूर्णत्वाकडे..बिलोलीतील ७३ ग्रामपंचायतींना मिळणार हायस्पीड इंटरनेट

ग्रामपंचायतीमधील कारभार ऑनलाईन करुन नागरिकांना गावपातळीवरच जलद गतीने सेवा देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या महानेट जोडणीचे काम बिलोली तालुक्यात अंतिम टप्प्यात आले आहे.
बिलोली इंटरनेट
बिलोली इंटरनेट

बिलोली ( जिल्हा नांदेड ) : ग्रामपंचायतीमधील कारभार ऑनलाईन करुन नागरिकांना गावपातळीवरच जलद गतीने सेवा देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या महानेट जोडणीचे (Internet conection) काम बिलोली (Biloli) तालुक्यात अंतिम टप्प्यात आले आहे. या योजनेत तालुक्यातील 73 ग्रामपंचायतींना (Grampanchayat) हायस्पीड इंटरनेट सेवा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे.

ग्रामपंचायतीचा कारभार आधुनिक तंत्रज्ञानाची जोडून नागरिकांना अधिकाधिक जलद सेवा देण्याच्या उद्देशाने युती शासनाच्या काळात २०१८- १९ मध्ये भारतनेटच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत महानेटचा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने मागील दोन वर्षापासून राज्यातील तेरा हजार ग्रामपंचायतींना इंटरनेटची जोडणी केली जात आहे. दोन वर्षात प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत आॅप्टिक फायबर केबल टाकण्यासह इंटरनेटसाठी लागणारी सर्व साधन सामुग्री पुरविण्यात आली आहे. व त्याची जोडणीही करण्यात येत आहे.

हेही वाचा - स्मृती दिन विशेष : राजर्षी शाहू महाराज सामाजिक समतेचा आग्रह

बिलोली तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतीचा यात समावेश असून चाळीस ग्रामपंचायतींचे नेट जोडणीचे काम पूर्ण झाले आहे. ३३ ग्रामपंचायतीचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या काही दिवसात तेही पूर्ण होणार आहे. तालुक्यातील काही भागात रस्त्यांची कामे सुरु असल्याने केबलची जोडणी केलेल्या ठिकाणी काही प्रमाणात अडचणी येत आहेत.

सध्यस्थितीत सर्वच विभागाचा कामकाज ऑनलाईन पद्धतीने सुरु असून ग्रामपंचायतीमधील कामकाजही ऑनलाइन करण्यावर भर देण्यात आला आहे. नागरिकांना दिले जाणारे विविध प्रकारचे दाखले, परवानगी व अन्य कामकाज यापुढे ऑनलाइन केला जाणार आहे. इंटरनेट सेवा विस्कळीत होत असल्याने व ग्रामीण भागात भारनियमनाचा प्रश्न गंभीर असल्याने ऑनलाईन कामकाज करताना अनेक अडचणी निर्माण होत असत. मात्र महानेटचे काम पूर्ण झाल्यानंतर ग्रामपंचायतीला हायस्पीड इंटरनेट सेवा मिळणार आहे. आपले सरकारच्या माध्यमातून ग्रामपंचायतीत ऑपरेटरची नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीची कामे जलद गतीने होणार आहेत.

असा होणार नागरिकांना फायदा

इंटरनेटची जोडणी पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना गावपातळीवरच सर्व प्रकारचे दाखले उपलब्ध होणार आहेत. पिक विमा व बँकेचे कामकाजही गावपातळीवरच पूर्ण केल्या जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा रोजगार बुडणार नाही. शेतकऱ्यांची भटकंती थांबेल. इंटरनेट बंद आहे म्हणून पळवाटा काढणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना चपराक बसणार असून त्यांना प्रामाणिकपणे काम करावे लागणार आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com