शेतकऱ्यांवर पुन्हा संकट : ढगाळ वातावरणामुळे तुरीवर आळीचा प्रादुर्भाव

file photo
file photo

नांदेड : यंदा अतिवृष्टीमुळे बळिराजाच्या हातातोंडाशी आलेला घास फिरावला आणि बळीराजाची अवस्था बिकट झाली. अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांचे मात्र हाल झाले. सोयाबीन पिकाला लागवड केलेला खर्चही वसूल झाला नाही. बळीराजाच्या आता सर्व आशा तूर पिकावर होत्या. परंतु मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या पिकांची मोठ्या प्रमाणात फुल गळती होत आहे. व आळीचा देखील मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. याबाबत शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या मदतीची गरज असून मात्र कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

सोयाबीन व कापूस हे नगदी पीक शेतकऱ्यांच्या हातचे गेल्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला. मात्र शेतावर उभ्या असलेल्या तुर पीक बहारदार फुलाने फुलून आल्याने शेतकरी आनंदित होता. मात्र मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे तुरीवर आळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. सोयाबीन व कापसानंतर आता सर्व नजर तुरीच्या पीकावर होती. पण अचानकपणे वातावरणातील बदलाचा फटका या पिकाला बसला आहे.

विशेष म्हणजे सोयाबीन पिकाप्रमाणे तूर पीकावर पडलेल्या किडीचा बंदोबस्त करण्यासाठी रासायनिक खते व कीटकनाशके यांचा भाव गगनाला भिडले आहेत. ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात आळीचा प्रादुर्भाव झाला आहे. तिचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हजारों रुपयांची औषधे फवारणी करावी लागते. आधीच सोयाबीन आणि कापूस हातचा गेल्याने शेतकरी राजा हतबल झाला होता. आता तूर पिकही जाण्याच्या मार्गावर दिसत आहे. अद्यापही सोयाबीनचे नुकसान झालेल्याची मदत मिळाली नाही. आणि आता तूर देखील हातची जाते की काय अशी चिंता बळीराजाला लागली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com