अर्धापूर (जिल्हा नांदेड) : बीबीएफ तंत्रज्ञान सोयाबीन पिकासाठी उपयुक्त आहे. या तंत्रज्ञानामुळे एकरी बियाणे कमी लागते. जास्त पाणी झाले तर सरीमधून वाहून जाते. तसेच सोयाबीनचे उत्पादन वाढण्यासाठी ही पेरणी पध्दत उपयुक्त आहे. शेतक-यांनी या पध्दतीने पेरणी करावी असे आवाहन नांदेड जिल्हा कृषी अधिक्षक रवीशंकर चलवदे यांनी सोमवारी (ता. 21) अर्धापूर येथे कृषी संजीवनी अभियाना शुभारंभाच्या प्रसंगी केले. जिल्ह्यातील सोळा तालुक्यात हे अभियान राबविण्यात येणार असून कृषीदिनी एक जुलैला सांगता होणार आहे.
शेतक-यांच्या बांधावर जावून अधुनिक तंत्रज्ञान, बि- बियाणे, विकेल ते पिकेल, फळबाग लागलड आदीबाबत माहिती देण्यासाठी कृषी संजीवनी अभियान कृषी विभागाच्या वतीने राज्यभर राबविण्यात येत असून नांदेड जिल्ह्यातील सुरुवात अर्धापूर तालुक्यातुन झाली. शेतक-यांना दररोज एका कृषी विषयक विषयाची माहिती देण्यात येणार आहे.
शहरातील शेतकरी सोनाजी सरोदे यांच्या शेतात बीबीएफ पध्दतीने सोयाबीन पेरणी बाबत माहिती शेतकरी मेळावा घेण्यात आला. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी रविकुमार सुखदेव, प्रभारी तालुका कृषी अधिकारी संजय चातरमल, कृषी साहाय्यक सविता जारीकोटे, शेतकरी प्रवीण देशमुख, पिराजी सारखरे, पंकज देशमुख, विष्णू जडे, महिला शेतकरी रंजना देशमुख, सुनिता देशमुख, चंद्रकला देशमुख, सुष्मा देशमुख आदी उपस्थीत होते. शेतकरी, अधिकारी यांच्या उपस्थितीत सोयाबीनची पेरणी करण्यात आली.
यावेळी उपस्थित शेतक-यांशी संवाद साधतांना रवीकुमार चलवदे म्हणाले की, शेतक-याना अधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी कृषी विभागाने कृषीसंजीवनी हे अभियान सुरु केले आहे. या दहा दिवसाच्या काळात जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील शेतक-यांना विविध विषयांबाबत माहिती देण्यात येणार आहे. कमी खर्चात उत्पन्नात वाढ, ज्या पिकांना मागणी आहे. त्याचे उत्पादन करणे, एक गाव एक वान आदींचा बाबतीत माहिती देण्यात येणार आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.