अर्धापुरात ओबीसींचा एल्गार; राजकीय आरक्षण कायम ठेवण्याची मागणी

ओबीसींच्या राजकीय आरक्षण बाबत तालुक्यात चलबीचल सुरु झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण जाणार की राहणार या बाबत राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु आहे.
अर्धापूर ओबीसींचे आंदोलन
अर्धापूर ओबीसींचे आंदोलन

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : इतर मागासवर्गीय प्रवर्गाचे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील राजकीय आरक्षण कायम ठेवण्यात यावे या मागणीसाठी ओबीसीं आरक्षण बचाव समितीने एल्गार पुकारला असून या मागणीचे निवेदन तहसीलदारांना शुक्रवारी (ता. 18) देण्यात आले आहे. तसेच या मागणीसाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

ओबीसींच्या राजकीय आरक्षण बाबत तालुक्यात चलबीचल सुरु झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण जाणार की राहणार या बाबत राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु आहे. या बाबत ओबीसी प्रवर्गातील स्थानिक लोकप्रतिनिधी पासून ते जिल्हा पातळीवरील नेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ओबीसींचा प्रवर्गातील कोणत्या समाज घटकांच आरक्षणावर गदा येणार या बाबत स्पष्ट माहिती कुठेच मिळत नाही.

हेही वाचा - 'कॉफी विथ सकाळ'मध्ये बोलताना शिवसेनेला दिला सज्जड दम

अर्धापूर शहरासह तालुक्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विविध पक्षातील स्थानिक पदाधिकारी, सामाजिक संघटना, डाॅक्टर, पत्रकार, प्राध्यापक आदींनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नावाने असलेले निवेदन तहसीलदार सुजित नरहरे यांना देण्यात आले. यावेळी बाबुराव लंगडे, डाॅ. विशाल लंगडे, प्रा. डाॅ. रघुनाथ शेटे, तुकाराम साखरे, गुणवंत विरकर, आनंद सिनगारे, सखाराम क्षिरसागर, गोरखनाथ राऊत, छत्रपती कानोडे, उमेश पांचाळ, विवेक चिंचलवाड, विलास कापसे, गुरुराज रणखांब, व्यंकटी राऊत, योगेश हाळदे, तुकाराम माटे, ओम नागलमे, शिवशंकर पिंपळे, गोविंद राऊ, संदीप राऊत, राजेश कानोडे आदी उपस्थित होते.

येथे क्लिक करा - सेलू तालूक्यात वर्षभरापासून ३१ गावांत पोलिस पाटलांची पदे रिक्त

लवकरच स॔घर्ष समितीची बैठक

स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मंडल आयोग लागू झाल्यावर इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विविध समाज घटकाला आरक्षण मिळाले. गावकुसात राहणा-या विविध समाज घटकाला न्याय मिळाला. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालीका, महानगरपालिका आदी संस्थामध्ये सत्तेची भागिदारी वाढली. पण आता आरक्षण जाणार की काय आशी चिंता निर्माण झाली आहे. हे आरक्षण टिकविण्यासाठी तालुक्यातील सर्व पक्षातील, विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकारी, व्यवसायिक यांची बैठक घेवून संघर्ष समितीची स्थापना करण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार गुणवंत विरकर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com