पाठ्ये पुस्तके मिळाली, पुढे काय?

File photo
File photo

नांदेड : यावर्षी पहिल्यांदाच १५ जूनला शाळा भरली नाही. असे असलेतरी, विद्यार्थ्यांपर्यंत घरपोच मोफत पुस्तकांचे वितरण झाले आहे. मात्र, विद्यार्थी शाळेतच येत नसल्याने, तसेच पुस्तक वाचून तरी काय कळणार? म्हणून पुस्तके अद्यापही घराच्या कोपऱ्यात पडून आहेत. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे काय? असा प्रश्‍न आता समोर येवू लागला आहे.
 
पाठ्यपुस्तके शाळांना आणि विद्यार्थ्यांना प्राप्त झाली आहेत, परंतु शाळा सुरु होण्याबद्दलचा संभ्रम अजुनही कायम आहे. शासनाने तारखा जाहीर केल्या असल्या तरी अजुनही राज्यात करोना संक्रमण वाढतानाच दिसत आहे. दररोज जिल्हा स्तरावर देखील संक्रमित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पालक चिंतेत आहेत.

राज्यातील चाळीस टक्के शाळा आॅनलाइन शिक्षण देत आहेत.  चाळीस टक्के विद्यार्थी आणि पालक या आॅनलाइन शिक्षणासाठी सुविधा संपन्न आहेत. शिक्षक वेगवेगळ्या अॅपद्वारे आपल्या विद्यार्थ्यांना अध्यायनास प्रेरीत करीत आहेत. राज्याचे शिक्षण संचालक (विद्या प्राधिकरण) डाॅ. दिनकर पाटील यांनी दीक्षा सोबत अभ्यासाचा एक मार्ग ही विचारधारा घेऊन महाराष्ट्रात अध्ययन चळवळ गतीमान केली आहे.  

आता ज्या साठ टक्के विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाही अशा पालक, विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके हा मोठा आधार झाला आहे. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना वाचन लेखन येत नाही. एवढाच प्रश्न आहे. इयत्ता दुसरीपासून बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना वाचन करता येते, त्यामुळे त्यांचा अभ्यास आता आपोआप सुरु होईल. इयत्ता आठवीपर्यंत शासन मोफत पाठ्यपुस्तके वितरीत करते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पालक आणि शिक्षकांनी वाचन करण्याची प्रेरणा द्यावी.

शिक्षकांनी घरोघरी जाऊन पाठ्यपुस्तकांचे वाचन आणि त्या धड्याखाली दिलेल्या सोप्या स्वाध्यायाचे अध्ययन करण्याची प्रेरणा देण्याची गरज आहे. गावातील डीएड, बीएड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी करावी. महाराष्ट्रात आज घडीला पाच ते सहा लक्ष डीएड, बीएड, विद्यार्थी बेकार आहेत. त्यांना शिक्षकांनी प्रेरीत करून पाच-पाच विद्यार्थी नेमून द्यावेत आणि ज्यांच्या घरी मोकळी जागा आहे तेथे शारीरिक दुरावा ठेवून, मुखावरण लावून आणि सॅनीटाझेशन करून अभ्यास सुरु करण्याची शिस्तबद्ध प्रणाली सुरु करावी. पालक घरीच बसून शिक्षण मिळते म्हणून मुलांना शिकू द्यायला राजी होतील.

येथे क्लिक कराच - माहूर गड : श्री दत्त शिखर संस्थान येथे गुरू पोर्णिमा

शिक्षित पालक नव्या पाठ्यपुस्तकांसोबत स्वतः शिकायला प्रेरणा देतील. पाठ्यपुस्तके वाचून, स्वाध्याय सोडवून आणि लिहायची प्रेरणा देऊन शिक्षण सुरु होऊ शकते. शिक्षण, शिक्षण म्हणजे तरी काय असते? पाठ्यपुस्तकातील आशय, संस्कार, प्रश्नोत्तर समजून घेऊन ते सोडवणे म्हणजे शिक्षण आधीच संकुचित शिक्षण परीभाषा आपण करून ठेवली आहे. डीएड, बीएड मुले नसतील बारावी, बीए विद्यार्थीही अशा अभ्यासाचे काम करू शकतील. त्यचा शालेय समितीने शेवटी गावात जाहीर सन्मान करावा. प्रमाणपत्रही द्यावे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com