महावितरण : महाकृषी ऊर्जा अभियान शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणारे अभियान- मुख्य अभियंता पडळकर

file photo
file photo

नांदेड : ऊर्जा विभागाच्या वतीने प्रजासत्ताक दिनापासून राज्यभरात सुरू करण्यात आलेले महा कृषी ऊर्जा अभियान २०२० हे खऱ्या अर्थाने शेकऱ्यांसाठी नवसंजीवनी देणारे ठरणार आहे. या अभियाना अंतर्गत वीजजोडणीच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना नवीन वीज जोडणी तसेच थकबाकीदार शेतकऱ्यांना थकबाकी मुक्त करण्यासाठी थकीत रकमेवरील विलंब आकार माफ व व्याजामध्ये सवलत मिळणार आहे. त्यामुळे या अभियानाचा लाभ्‍ सर्व शेतकऱ्यांनी घेण्याचे अवाहन नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी केले आहे.

महावितरणच्या मुदखेड उपविभागा अंतर्गत येणाऱ्या आम्राबाद येथे ( ता. ३०) आयोजीत मेळाव्यामध्ये महाकृषी ऊर्जा अभियान २०२० ची सविस्तर माहिती उपस्थित ग्रामस्थांना देताना मुख्य अभियंता श्री पडळकर म्हणाले की, शेतकऱ्यांच्या विजपुरवठयाच्या विविध अडचणींचा अभ्यास करून शेतकऱ्यांना शाश्वत शेती करता यावी या उद्देशाने या नवीन अभियानाची सुरवात करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत ३० मीटरच्या आत असलेल्या सर्व कृषीग्राहकांना तात्काळ वीज जोडणी देण्यात येणार आहे. तसेच ज्या कृषीपंप अर्जदाराचे अंतर लघुदाब वाहिनीच्या २०० मीटर आत आहे व रोहित्रावर पर्याप्त क्षमता उपलब्ध आहे. अशा नवीन कृषीपेप ग्राहकांना तीन महिण्याच्या आत नवीन जोडणी देण्यात येईल. २०० ते ६०० मीटरच्या आत असलेल्या कृषीग्राहकांना उच्चदाब वितरण प्रणालीचा पर्याय उपलब्ध असणार आहे. 

नवीन वीजजोडणीसोबतच कृषीपंप वीज देयक सवलत धोरण राबविले जात आहे. पाच वर्षापुर्वीच्या म्हणजेच सप्टेंबर २०१५ पुर्वीच्या कृषीपंप थकबाकीवरील विलंब आकार व व्याज माफ करण्यात येणार आहे तसेच पाच वर्षापर्यंतच्या म्हणजेच सप्टेंबर २०१५ पर्यंतच्या थकबाकी वरील संपुर्ण विलंब आकार माफ होईल तसेच व्याजदरात सवलत देण्यात येईल. त्यामुळे थकबाकीदार कृषीपंप ग्राहकांनी या संधीचा लाभ घेवून अख्ये गाव थकबाकी मुक्त करावे असे अवाहनही केले. या थकबाकीतून मिळणारा ३३ टक्के पैसा हा संबंधीत ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या वीजयंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीवरच खर्च करण्यात येणार आहे असे ही श्री पडळकर यांनी सांगीतले. या अभियाना अंतर्गत नांदेड परिमंडळातील २९ जानेवारीपर्यंत २४४ शेतकऱ्यांना नवीन वीज जोडणीही देण्यात आली आहे त्याचबरोबर थकबाकीदार कृषीपंपधारकांनी एक कोटी १७ लाख रुपयांची थकबाकी भरुन महा कृषी ऊर्जा अभियान २०२० चा लाभ धेण्यात आल्याचे ही मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकरांनी सांगितले.

या प्रसंगी नांदेड ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता आर. पी. चव्हाण यांनीही ग्रामस्थांना अभियाना संदर्भात माहिती दिली. सदरील मेळावा यशश्वीकरण्यासाठी उपविभागीय अभियंता पंकज देशमुख तसेच लेखा विभागाचे अधिकारी, जनमित्र यांनी परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com