नांदेड : शेतीच्या नुकसानीच्या निषेधार्थ महामार्गात उभी केली बैलगाडी

तामसा येथील पुलावरील प्रकार; दोन तास वाहतुकीचा खोळंबा
Nanded farmer agriculture loss
Nanded farmer agriculture losssakal

तामसा : तामसा येथील नदी परिसरात असलेल्या शेतात पेरलेले सोयाबीन बियाणे मंगळवारी रात्रीच्या पावसाच्या पाण्याने खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आले असून संतप्त शेतकऱ्याने या नुकसानीला जबाबदार असलेल्या राष्ट्रीय महामार्गाची संबंधित रुद्राणी कन्स्ट्रक्शनच्या विरोधात निषेध म्हणून तामसा नदीवरील निर्माणाधीन पुलाच्या खालील पर्यायी पुलावर बैलगाडी उभी केल्याने बुधवारी दोन तास वाहतुकीचा खोळंबा झाला.

येथील शेतकरी आत्माराम तामसेकर यांचे शेत व रस्त्याच्या मध्यभागातून मोठा नाला नदीपात्रात मिसळतो. दोन वर्षापासून नदीवर मोठ्या पुलाचे व राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू आहे. रस्ता रुंदीकरणामुळे तामसेकर यांच्या शेताजवळील नाला नामशेष झाल्याने नाल्याचे पाणी शेतात घुसून दोन वर्षापासून होणाऱ्या नुकसानीकडे संबंधित कन्स्ट्रक्शनसह जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे लेखी स्वरुपात अर्ज करून लक्ष वेधले आहे. पण प्रशासकीय अधिकारी व संबंधित कन्स्ट्रक्शनने दुर्लक्ष केले.

मंगळवारी तामसेकर यांनी शेतात सोयाबीन बियाणे पेरले. रात्री परिसरात मोठा पाऊस होऊन नामशेष झालेल्या नाल्याचे पाणी शेतात घुसून पेरलेले बियाणे खरडून गेले. यामुळे शेतकरी तामसेकर यांचे कुटुंबीय हळहळून संतप्त बनले. यंत्रणेचा निषेध करीत नुकसान भरपाईच्या मागणीसाठी तामसेकर यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन म्हणून स्वतःची बैलगाडी व बैलजोडी पर्यायी पुलाच्या मध्यभागी उभी केली. यामुळे पर्यायी पुलाच्या दोन्ही बाजूला शेकडो वाहने अडून वाहतूक खोळंबली. घटनास्थळी यंत्रणेचे कर्मचारी आले.

यावेळी जमलेल्या प्रवाशांनी शेतातील नुकसान बघून यंत्रणेच्या चुकीच्या कामाबद्दल संताप व्यक्त केला. घटनास्थळी असलेली माजी सरपंच खंडेराव आगलावे, ज्येष्ठ शेतकरी गणपतराव हनवते, भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हा सदस्य दीपक देशमुख, शिवसेनेचे ज्ञानेश्वर विभूते यांनी रुद्राणी कन्स्ट्रक्शनच्या कर्मचाऱ्याना चांगलेच फैलावर घेऊन ताबडतोब नुकसान भरपाईची मागणी केली. लिखित आश्‍वासनानंतर शेतकरी तामसेकर यांनी आंदोलन मागे घेतले.

दोन वर्षापासून नामशेष नाल्याचे पाणी शेतात घुसून नुकसान सहन करीत आहे. रुद्राणी कन्स्ट्रक्शनने पाईपद्वारे नाल्याचे पाणी नदीपात्रात सोडून देण्याचे आश्वासन देऊनही पूर्ण केले नाही. मंगळवारच्या नुकसानीत अंदाजे २५ हजाराचे सोयाबीन बियाणे खरडून वाहून गेले आहे.

- आत्माराम तामसेकर, शेतकरी, तामसा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com