नांदेड : किसान रेल्वे, घरकुल लाभार्थ्यांची थकीत रक्कम मिळण्यासाठी लक्ष घालणार- जिल्हाधिकारी इटनकर

file photo
file photo

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : तालुक्यातील अतीवृष्टीने बाधीत शेतक-यांना संथपणे वाटप होणारे अनुदान, शेतमाल वाहतूकीसाठी किसान रेल्वे सुरु करण्यासाठी तातडीने शेतकरी, व्यापारी यांची बैठक घेण्यात येईल. तसेच पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांची थकीत रक्कम मिळण्यासाठी व मुख्यालयी अधिकारी व कर्मचारी राहणे यासाठी लक्ष घालण्यात येईल अशी माहिती पत्रकाराशी संवाद साधताना जिल्हाधिकारी डाॅ विपीन इटनकर यांनी शुक्रवारी (ता. 29) दिली.

शेतमालाच्या रेल्वेमधून वाहतुकीचा प्रश्न उपस्थित होताच जिल्हाधिका-यांनी तात्काळ आपल्या रेल्वेतील मित्र असलेल्या अधिका-यांशी मोबाईलवरुन संपर्क केला. तसेच याविषयी लवकरच सर्व संबंधितांची बैठक घेण्यात येईल असे आश्वासन रेल्वेच्या अधिका-यांनी दिले. जिल्हाधिका-यांची तत्परता व शेतक-यांप्रती दाखवलेली आस्था पाहून शेतकरी,नागरिक आवाक झाले.

अर्धापूर तहसील कार्यालयाच्या सभागृहात प्रशासन आपल्या गावी या अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी डाॅ विपीन इटनकर, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण आले होते. तालुक्यातील अतीवृष्टीने बाधीत झालेल्या शेतक-यांना कासवगतीने वाटप होत आहे. या वाटपाला सुरुवात होवून आडीच महिने झाले तरी निम्मेच वाटप झाले आहे. तर शहरातील पंतप्रधान आवास योजनेचा लाभार्थ्यांचे सुमारे साडेचार कोटी थकीत असल्यामुळे हे कर्जबाजारी झाले आहेत. जिल्हात केळी, हाळद भाजीपाला पिके, फुलांचे खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते. या शेतमाल्याच्या वाहतूकीसाठी भाड्यात सवलत आसलेल्या किसान रेल्वे सुरु करण्यात यावी अशी मागणी आहे. केळी काढण्याच्या  हंगामात नांदेड, हिंगोली व परभणी या तीन जिल्ह्यातून पाच हजार टन केळी देशात पाठविण्यात येते. 

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com