मारतळा : परिसरात खरीप हंगामाच्या शेवटी झालेल्या अतिवृष्टीने यंदा रब्बी क्षेत्र दुप्पट वाढले आहे. त्यात हरभऱ्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. जमिनीतील असलेला ओलाव्यामुळे पेरलेले बी पूर्ण उगवले, पण मर रोगामुळे हिरवीगार झाडे उभी वाळत आहेत. सतत ओलावा व ढगाळ वातावरणाने जमिनीत बुरशी तयार होऊन, हरभऱ्यावर मर रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यास महागडी औषधे फवारून उपयोग होत नसल्याने, शेतकरी अडचणीत सापडला आहे.
मारतळा परिसरात खरिपाच्या शेवटी झालेल्या अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेला घास हिरावला. त्यामुळे आता सर्व मदार रब्बीवर असून, यंदा दुपटीने रब्बीचे क्षेत्र वाढले. त्यात सर्वाधिक पसंती शेतकरी हरभरा पिकास देत आहेत. त्यामुळे हरभरा पिकाची पेरणी करण्यात आली आहे. तसेच गहू, ज्वारी या पिकाचाही पेरा आहे.
मात्र सतत जमिनीतील ओल असल्यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला, असून हरभरा पीक धोक्यात आले आहे. हिरवीगार असलेली झाडे उभी वाळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परिणामी शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे. खरिपातही अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले, आता रब्बीतही असेच होते की काय? अशी शेतकऱ्यांच्या मनात भीती आहे.
खरीप हंगामात पावसाने पिकाचे मोठे नुकसान होऊन हातात काहीच उरलेले नाही. तर रब्बी हंगामातही हरभऱ्यावर मर रोगामुळे आणि वाढीतील उभी झाडे वाळत असून पिकाचे मोठे नुकसान होत आहे.
- विठ्ठल लामदाडे, शेतकरी.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.