अंत्योदय गटातील मोफत गहू वाटपात कपात

दोन किलो ऐवजी एकच किलो मिळणार गहू
PM garib kalyan yojna free wheat Reduction get 1kg instead 2kg
PM garib kalyan yojna free wheat Reduction get 1kg instead 2kgsakal

नांदेड : पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत अंत्योदय गटातील लाभार्थ्यांना वाटप करण्यात येत असलेल्या गहू वाटपास शासनाने कात्री लावली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना आता दोन किलो मोफत गहू ऐवजी एकच किलो गहू मोफत मिळेल. कमी झालेल्या गव्हाच्या बदल्यात लाभार्थ्याला एक किलो तांदूळ मोफत दिला जाणार आहे.

कोरोनाचा सामना करण्यासाठी शासनामार्फत पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत गरिबांना मार्च-एप्रिल २०२० पासून मोफत धान्य देण्यात आले. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरिबांना मे व जून २०२१ मध्ये मोफत धान्य वाटपाची योजना जाहीर केली होती. त्याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील गरिबांसाठीच्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची व्याप्ती जुलै ते नोव्हेंबर २०२१ पर्यंत वाढवली होती. दरम्यान ही मुदत नोव्हेंबर २०२१ मध्ये संपत असतानाच केंद्र सरकारने मार्च २०२२ पर्यंत मोफत धान्य देण्याचे जाहीर केले होते. ही मुदत संपत असतानाच केंद्र सरकारने योजनेला आणखी सप्टेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना मोफत वाटप

पंतप्रधान गरीब कल्याण या योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी यांना प्रती सदस्य प्रतिमहा एक किलो गहू व चार किलो तांदळाचे वाटप करण्यात येईल. सदर वाटप लाभार्थ्यांना मोफत करण्यात येणार आहे. यापूर्वी लाभार्थ्यांना दोन किलो गहू व तीन किलो तांदुळाचे वाटप करण्यात येत होते. अंत्योदय गटाला गहू वाटपाला कात्री लागली असली तरी प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना मात्र प्रती सदस्य प्रतिमाह दोन किलो गहू, तीन किलो तांदूळ याचे वाटप मोफत करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com