शिक्षकांनाच साधावा लागेल पालकांशी संवाद, काय आहे कारण?

File photo
File photo

नांदेड : कोरोनाच्या कालावधीत शिक्षकांनी एकविसाव्या शतकातील कौशल्य आत्मसात करून जास्तीतजास्त पालकांशी संवाद साधणे गरजेचे आहे. कारण सध्याच्या काळात शिक्षक थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकत नसल्याने काही काळ पालकांनाच शिक्षकाची भूमिका निभावयाची आहे. संकटे मोठी आहेच, परंतु, माणसे संकटापेक्षाही मोठे आहेत, त्यासाठी हे करावेच लागणार आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून देश लॉकडाउन करण्यात आला. त्यामुळे सर्व माध्यमांच्या शाळा, महाविद्यालये २४ मार्चपासूनच बंदच आहेत. परिणामी विद्यार्थ्यांचा किलबिलाट नवीन शैक्षणिक वर्षात कधी होईल हे सांगता येत नाही. कारण, शाळा केव्हा उघडेल, हे अद्याप कोणालाच माहिती नाही. असे असले तरी विद्यार्थ्यांना लॉकडाउनच्या काळात विद्यार्थ्यांना घरीच राहून घरचे कामकाज, श्रमप्रतिष्ठा बद्दलचे महत्त्व पालकांना पटवून द्यावे लागणार आहे.

...तरच विद्यार्थी होतील तंदुरुस्त
विद्यार्थी सद्यस्थितीत स्पर्धेमध्ये गुंतुन गेल्यामुळे पुस्तक आणि अभ्यासाशिवाय त्याला काहीच दिसेनासे झाले आहे. परिणामी, स्वतःच्या शारीरिक तंदुरुस्तीसोबतच श्रम काय असते? हे त्याला कळेनासे झाले आहे. त्यामुळे लॉकडाउन ही संधी समजून शिक्षक तसेच पालकांनी विद्यार्थ्यांमध्ये श्रमाचे महत्त्व रुजविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांना नियमित व्यायाम, योगाभ्यास, आदींविषयी मार्गदर्शन केलेतर निश्‍चितच विद्यार्थी अभ्यासासोबतच शारीरिक तंदुरुस्त होण्यास वेळ लागणार नाही. 

पालकांना बळ देण्याची गरज
लॉकडाउनच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी अनेक शाळांनी आॅनलाइन शिकविणे सुरु केले आहे. त्यामध्ये आकाशवाणी, दूरदर्शन, दीक्षा अॅप्स ही माध्यमेही कमी अधिक प्रमाणावर मुलापर्यंत पोहोचत आहेत. याशिवाय मुलांच्या शिक्षणासाठी नवीन वाहिनीही सुरु करण्याचा शासनाचा विचार आहे. ‘दीक्षा अॅप्स’च्या संदर्भात राज्याने उत्तम कामगिरी केल्याचे शिक्षण तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. नवीन सत्रात एकही मूल शाळाबाह्य राहू नये, याकरिता प्रत्येक पालकांशी संवाद साधावा लागणार आहे. प्रत्येक पालकांना बळ द्यावे लागणार आहे, हे विसरून चालणार नाही.   

स्क्रीन टाइम कमीच असावा
आजच्या काळाची ई-लर्निंग जरी गरज असली तरी दोन तासांपेक्षा विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाइम अधिक असू नये. आपल्याला मुलांना शिक्षण द्यायचे आहे, आजारी करायचे नाही. त्यामुळे कमी वेळेत अधिक शिक्षण कसे देता येईल, यावर शिक्षकांनी भर द्यायला पाहिजे.
- विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com