अर्धापूरातील या गावात ईश्वरी चिठ्ठीने दिली संधी, कालीका पवार ठरल्या भाग्यवान

file photo
file photo

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : लोकशाहीत प्रत्येक मत महत्वाचे असते. एका मताच्या फरकाने सरकार येते तसेच जातेही. जेंव्हा मतदार संख्या कमी असते त्या निवडणुकीत एक एक मत महत्वाचे ठरते. याचा प्रत्यय ग्रामपंचायत निवडीतही आला आहे. शाहपूर (जिल्हा नांदेड) येथील निवडणूकीत दोन्ही उमेदवारांना समान मते पडल्याने ईश्वरी चिठ्ठीने उमेदवार विजयी घोषित करण्यात आला. यात कालीका पवार भाग्यवान ठरल्या असून त्यांना विजयी घोषित करण्यात आले आहे.

तालुक्यातील 37 ग्रामपंचायतीची मतमोजणी सोमवारी (ता. 18) पार पडली. तालुक्यातील मतदारांना प्रस्थापितांना धक्का देत गावाचा कारभार तरुणांच्या हातात दिला आहे. तर काही गावात सत्ता परिवर्तन झाले आहे. शाहपूर गटग्रामपंचायतीच्या एका जागाच्या निकालाने जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. येथील ग्रामपंचायत सात सदस्यांची असून पाच जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. दोन जागेसाठी मतदान घेण्यात आले. यात वार्ड क्रमांक तीन (ब) मधून महीला सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असलेले जागेसाठी कालीका भगवान पवार व गोकर्णा राजाराम पवार यांनी लढवली. ही लढत अतिशय चुरशीची व अतितटीची झाली.

या दोन्ही काटे की टक्करमध्ये 327 मतदारांनी व एका मतदारांनी टपाली मतदानचा हक्क बजावला. दोन्ही मिळून 328 मतदान झाले. यात कालीका पवार यांना 162 तर गोकर्णा पवार यांना 161 मते व एक टपाली मत असे एकूण 162 मिळाली. तर चार मते नोटाला गेली. दोन्ही उमेदवारांना समान मते पडल्याने ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. यात कालीका भगवान पवार भाग्यवान ठरल्या. त्यांना ईश्वरचिठ्ठीने कौल दिला. त्यांना विजयी घोषित करण्यात आले. या अटीतटीच्या निवडणूकीत टपाली मताने विजयाचे पारडे फिरवले आहे. तर तालुक्यातील काही उमेदवार एक ते दहा मातांच्या फरकाने विजयी झाले आहे. तेव्हा प्रत्येक मत महत्वाचे आहे. 

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com