Navratri festival 2019 : सृष्टीसौदर्यासह घाटनदेवी परिसराला ऐतिहासिक वारसा

ghatandevi.jpg
ghatandevi.jpg

इगतपुरी : मुंबई-आग्रा महामागावर नाशिकमार्गे मुंबईकडे जातांना नागमोडी वळणाचा कसारा घाट असुन इगतपुरीच्या पारिसरात प्रवेश करतांनाच थळ घाटाच्या पायथ्याशी शिवकालीन काळापासुन प्राचीन असे देवीचे मंदिराचे सुंदर बांधकाम करुन नवरात्रात सलग नऊ दिवस या भागाला यात्रेचे स्वरुप प्राप्त होते.घाटात देवीचे स्थान असल्यामुळे घाटनदेवी असे म्हणुन सुप्रसिद्ध झाले आहे. 

शैलपुत्री म्हणजेच घाटनदेवी माता 
प्रातःस्मरणीय घाटनदेवीच्या सानिध्यामुळे तर त्या पावित्र्यात आधिक भर पडली आहे घाटनदेवीचे रूप अत्यंत विराट आहे संकटसमयी भक्तांच्या मदतीला धावणारी व नवसाला पावणारी म्हणुन घाटनदेवीचा महीमा आहे घाटनदेवी मातेचा श्रीदुर्गा सप्तशतीमध्ये शैलपुत्री, ब्रम्हाचारीणी, चंद्रघाटा, कृष्णाडा, स्कंदमाता, कात्यायानी, कालरात्री, महागिरी, महासिध्दी, महागौरी, व रिद्धी - सिद्धी असे विविध रुपे आहेत. यातील पहिले रुप म्हणजे शैलपुत्री म्हणजेच घाटनदेवी माता होय प्राचीन माहीतीनुसार देवी वजरेश्वरीहुन भीमाशंकरकडे येण्यास निघाली त्यावेळेस रसत्यात देवीने या ठिकाणी विश्रांती घेतली व ती येथेच स्थिर झाली तीच ही घाटनदेवी होय शैलाधिराज तनया म्हुणुन या देवीची मोठी ओळख आहे. 

सृष्टीसौदंर्याने नटलेल्या परिसराला ऐतिहासिक वारसा
वजरेश्वरीहुन भीमाशंकरकडे प्रयाण करीत असतांना देवी येथे विश्रांती साठी थांबली अशी प्राचीन माहीती असली तरी आजही तीच खरी आहे असे येथे आल्यावर वाटते नैसर्गिक वातावरण आणि सुंदर पारिसराने मोहीत होऊन देवीने येथे मुक्काम ठोकला अशी पुरातन कथा आहे या मंदिरासमोरच उंटदरी नावाचे सृष्टीसौदंर्याने नटलेले ऐतिहासिक स्थान आहे. कल्याणचा खजिना लुटुन उंट याच दरीत लोटले होते यामुळे यादरीला उंटदरी असे नाव पडले आहे त्याचा अपभ्रंश उंटदरी असा झाल्याचे इतितासात नमूद आहे कोणताही सह्रदयी माणुस या ठिकाणी आल्याबरोबर अगोदर सृष्टीसौंदर्याकडे लक्ष देतो. विशेषता मुंबईकडे आणि नाशिककडे ये- जा करणारे वाहनातील प्रवाशी तर इतके भारावतात की, त्यांना सौंदर्यक्षण टिपुन घेण्याचा मोहच आवरता येत नाही. 

देवीचे रुप हे भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र
देवीचे लोभस आणि तेजस्वी रुप आजही भाविकांच्या आकर्षणाचे केंद्रस्थानी आहे वाघावर रूढ असलेली घाटनदेवी माता भक्तांना प्रसन्न मुद्रेने आशिर्वाद देऊन पुढील प्रवास सुखाचा होवो याचे वरदान देते म्हणुनच मंदिराच्या आसपास आजपावेतो कुठलाही आघात वा अपघात घडला नाही आणि गावावरही विशेब संकट आले नाही अशी स्थानिकांची धारणा आहे. वैदीक काळापासुन देवीची येथे स्थापना झाल्याचे नमुद आहे घाटनदेवीचा पूर्वी जुन्या ठिकाणी तांदळा होता तो जसा होता तसाच आजही कायम आहे. पूर्वापार असलेले जीर्णमंदिर पडुन गेल्याने गावातील जेष्ठ श्रेष्ठ भाविकांनी विचार करुन नव्या मंदिराच्या काम पुर्ण केले आहे.नवरात्र उत्सवात या ठिकाणी नऊ दिवस यात्रा भरते म्हणुनच नाशिक, मुंबई, पुणे, जव्हार विविध भागातुन भाविक दाखल होतात येथे भाविकांची पहाटे पाच पासुन ते रात्री दहा पर्यतं दर्शनासाठी गर्दी होत असते. 

शिवाजी महाराजांनी केली होती देवीची यथासांग व शास्त्रोक्त पुजा 
जव्हारकडून पुण्याकडे मावळ प्रातांत जाणारा अतिदुर्गम रस्ता याच उंटदरीतुन होता. भातसा नदीचा उगम याच दरीतुन झाला आहे उंटदरीपासुन जवळच असणाऱ्या घाटनदेवी मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज कल्याण मार्गे थळ घाटात आले होते. या काळात शिवाजी महाराज यांनी आपल्या मावळ्यांसह घाटनदेवीची यथासांग व शास्त्रोक्त पुजा अर्चा करून देवीचे दर्शन घेतले असल्याची नोंद इतिहासात नमूद आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com